शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पुढे ढकलण्यावरून मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:11 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रुग्णसंख्या वाढू लागल्याने संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ या पदाची ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी काही विद्यार्थी करू लागले आहेत. मात्र परीक्षा नियोजित वेळीच घ्यावी, यावरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

परीक्षा नियोजित वेळीच झाली पाहिजे असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर सध्या कोरोनाने राज्यभर थैमान घातले आहे. यावरून परिस्थिती भयाण आहे. तसेच पेठेतील २० टक्के विद्यार्थ्यांना कोरोनासदृश लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, परीक्षा देता यावी म्हणून विद्यार्थी अंगावर दुखणे काढत आहेत. उपचार घेण्यास वेळ लावल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून शहरातदेखील एखाद्या व्यक्तीने उपचार घेण्यास वेळ लावल्याने मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच एकदाची परीक्षा होऊन जाऊ द्या, असे मत असलेल्यांचा एक गट आहे. त्यामुळे परीक्षा झाली पाहिजे की नाही यावरून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

एमपीएससीची परीक्षा घेण्याची तयारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेऊन सिद्ध केले आहे. तसेच सरकारच्या झालेल्या बैठकीत परीक्षा घेण्याबाबत सकारत्मकता देखील दाखवण्यात आली आहे. तसेच वाहतुकीस देखील अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रवास, रिक्षा वाहतूक, खुली ठेवली जाणार आहे.

परीक्षेपेक्षा जीव महत्त्वाचा

परीक्षा पुन्हा कधीही देता येईल. एकदा जीव गेला की परीक्षेचा काय उपयोग होणार आहे. आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न कधीही पूर्ण करता येईल. मात्र, जीव गेलेला कसा आणून देणार आहे. एकवेळ रिकाम्या हाताने घरी गेले तरी चालेल, पण कोणा विद्यार्थ्याचे पार्थिव त्या निष्पाप आई-वडिलांच्या पदरी नको. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी भावनिक साद सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना घातली जात आहे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न

- आता परीक्षा पुढे गेली तर पुन्हा कधी परीक्षा घेतली जाणार

- पूर्व परीक्षा होऊ द्यावी, मुख्य परीक्षा लांबली तरी चालणार

- वय वाढत असून आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.

- पूर्व परीक्षेचा ताण वाढत जाणार