शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

पुणे : बालाजीनगर-धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, रोखपाल व मदतनिसाच्या मदतीने ४७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या ...

पुणे : बालाजीनगर-धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, रोखपाल व मदतनिसाच्या मदतीने ४७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालिकेला (दि. १) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायाधीश ए.व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला. सुनीता राजेंद्र नाईक (वय ५३ वर्षे रा.स.नं २०-१ पुण्याईनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या संचालिकेचे नाव आहे. याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक विलास राजाराम काटकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संचालक तसेच पतसंस्थेचे कर्मचारी यांच्यासह ६३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजीनगर धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २६ डिसेंबर १९९१ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीमध्ये संचालक आणि पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ४७ कोटी ९ लाख ८१ हजार ७५८ रुपयांचा घोटाळा केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले. आरोपींनी कर्ज खात्यांमध्ये स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत अपहार केला. पतसंस्थेतील ठेवीदारांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना पतसंस्थेत पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. अनेक वेळा पैशांची मागणी करून देखील पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालकांविरोधात तक्रार केली. आतापर्यंत १७० ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहे.

सुनीता राजेंद्र नाईक या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका आहेत. या संस्थेचे अध्यक्ष त्यांचे पती राजेंद्र नाईक होते. २० जानेवारी २०१८ ला राजेंद्र नाईक यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर सुनीता यांनी पद स्वीकारले. त्यामुळे पतसंस्थेच्या अपहारामध्ये त्यांची जबाबदारी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. नाईक यांच्या या आदर्श सहकारी पतसंस्थेत प्रत्यक्षात ठेवी जमा केलेल्या नसताना कर्ज रकमांची उचल करून या कर्जरकमा त्यांच्या संस्थेतील बचत खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. त्यांचे मुदतठेव तारण कर्जसंख्या प्रकरणे असून, त्यातील अपहारीत रक्कम ५२ लाख २० हजार रुपये तर, पुनर्गुंतवणूक ठेव तारण कर्जसंख्या प्रकरणे ९ आहेत. त्यातील अपहारीत रक्कम ३६ लाख ५० हजार रुपये आहे. ही रक्कम त्यांच्या बचत खात्यात वर्ग झाली आहे. एकूण अपहारीत रक्कम ही ९४ लाख ७० हजार अशी आहे. या गुन्हयाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.