शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

दिलीप वळसे पाटील यांचा षटकार

By admin | Updated: October 20, 2014 02:19 IST

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सलग सहाव्यांदा विजयी झाले असून, विजयाचा षटकार त्यांनी मारला आहे.

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सलग सहाव्यांदा विजयी झाले असून, विजयाचा षटकार त्यांनी मारला आहे. वळसे पाटील यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून, भाजपा व काँग्रेस उमेदवारांना सन्मानजनक मतेही मिळविता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी सलग सहाव्यांदा विजय संपादन करून एक विक्रम केला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी चढत्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला आहे. वळसे पाटील यांना १ लाख २० हजार २३५ मते मिळाली, तर शिवसेनेचे अरुण गिरे यांना ६२ हजार ८१ मतांवर समाधान मानावे लागले. गिरे यांच्यापेक्षा वळसे पाटील यांनी दुपटीने मते मिळविली आहेत. भाजपा उमेदवार जयसिंग एरंडे यांना ४ हजार ६१५, तर काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. संध्या बाणखेले यांना केवळ २ हजार ४०८ मते मिळाली आहेत. आज सकाळी ६ वाजता येथील क्रीडा संकुलमध्ये मतमोजणीचा प्रारंभ झाला. एकावेळी २०० यंत्रांची मोजणी केली जात होती. पहिल्या फेरीपासून वळसे पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली व प्रत्येक फेरीत ती वाढतच गेली. पश्चिम अदिवासी पट्टा शिरूर तालुक्याची आंबेगावला जोडलेली ३९ गावे येथे वळसे पाटील यांनी सर्वाधिक मते घेतलीच; पण शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मंचर व परिसरातील गावांमध्ये वळसे पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. मंचर शहरात प्रथमच राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काही मोजक्या गावांमध्ये शिवसेनेला किरकोळ स्वरूपाची आघाडी मिळाली असली तरी बहुतेक गावांमध्ये राष्ट्रवादीची आघाडी वाढतच गेली. उमेदवार गिरे यांच्या गावात वळसे पाटील यांनी मताधिक्य मिळविले आहे. शिवसेनेचा एकही गड शाबूत राहिला नाही. बारा वाजता मतमोजणी संपल्यानंतर वळसे पाटील मतमोजणी केंद्रावर आले तेव्हा कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कल्याण पांढरे यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र वळसे पाटील यांना दिले. मतमोजणी केंद्रामध्ये राष्ट्रवादी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मताधिक्यात वाढ होताच एकमेकांना शुभेच्छा देत झाली का नाही अशी चर्चा ते करत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते शेवटपर्यंत थांबले; पण निकाल स्पष्ट होताच त्यांनी निघून जाणे पसंत केले.