शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मध्यवर्ती व्यापारी पेठामधील कोंडी होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

पुणे : शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्यवस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या ...

पुणे : शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्यवस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते विस्तारलेले नाहीत. वाहनांची संख्या वाढल्याने याभागातील कोंडी प्रचंड वाढली आहे. अतिक्रमणे वाढत चालली आहेत. याच रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या सौंदर्याला बाधा येऊ लागली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर हा रस्ता ''मॉडर्न'' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारवाडा ते दत्तमंदिर तसेच दत्तमंदिर ते लोकमान्य टिळक पुतळा चौक या दरम्यानचा रस्ता ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गर्दी, दाटीवाटी आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्यावरील वाहतूक समस्या दूर करण्यासोबतच या रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यात येणार आहे.

शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा, लाल महाल, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, नानावाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, महात्मा फुले मंडई अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यासोबतच रविवार पेठेतील बोहरी आळी, इलेक्ट्रिक व मोबाईल मार्केट, पुस्तक मार्केट, भाजी मंडई अशी बाजारपेठ आहे. पारंपरिक व्यावसायिकांची वसाहत असलेल्या कसबा पेठेलाही हाच रस्ता जोडतो. त्यामुळे या रस्त्याचा विकास करून ऐतिहासिक ठिकाणे आणि बाजरापेठेची सोय दोन्हीही हेतू साध्य करण्याचा मानस असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

-----

गेल्या अनेक वर्षात या रस्त्याच्या विकासनावर फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. या रस्त्यावर अनके वर्षात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली नाही. आम्ही पुढील २०-२५ वर्षांचा विचार करून भूमिगत ड्रेनेज लाईन आणि जलवाहिनी टाकणार आहोत. यासोबतच प्रशस्त आणि देखणे पदपथ विकसित केले जाणार आहेत. रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून पथदिवे आकर्षक असणार आहेत. हा रस्ता पुढील अनेक वर्षे पुन्हा करावा लागणार नाही. व्यापारी, पादचारी, वाहनचालक सर्वांनाच त्याचा व्यवस्थित वापर करता येईल.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

------

शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने तसेच याभागात शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने वर्दळही अधिक आहे. वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. याभागातील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता विकसित झाल्यास मोठा प्रश्न मार्गी लागेल. विकासनाची नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती.

- पियुष शहा, नागरिक

-------

रस्ता अरुंद झाल्याने तसेच कोंडीची समस्यां निर्माण झाल्याने व्यवसायातही अडचणी येत आहेत. हा रस्ता प्रशस्त होणे तसेच नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होणे आवश्यक आहे. पालिकेकडून जर हे काम केले जाणार असेल तर व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. पालिकेने तात्काळ हे काम सुरू करावे.

- किशोर कदम, तरकारी व्यापारी, म. फुले मंडई