शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या तरतुदीमुळे विधी विभागाची अडचण

By admin | Updated: December 27, 2015 02:06 IST

एकूण खटल्यांपैकी महापालिकेच्या बाजूने निकाल लागणाऱ्या खटल्यांची संख्या जास्त असूनही महापालिकेच्या विधी विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अंदाजपत्रकातही या विभागाकडे

पुणे : एकूण खटल्यांपैकी महापालिकेच्या बाजूने निकाल लागणाऱ्या खटल्यांची संख्या जास्त असूनही महापालिकेच्या विधी विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अंदाजपत्रकातही या विभागाकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे पुरवणी अंदाजपत्रक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.नदीपात्रातील रस्त्यासंदर्भाचा खटला सर्वोच्च न्यायालयात हरल्यामुळे विधी विभागावर टीकेचा सामना करण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या वतीने या खटल्यात कपील सिब्बल, त्यांचा मुलगा व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ३ नामांकित वकील देण्यात आले होते. त्यांची फी काही लाख रुपये होती. त्यांनी पालिकेची बाजू मांडल्यानंतरही निकाल पालिकेच्या विरोधात गेला. मात्र, हा अपवाद वगळता विधी विभागाची एकूण कामगिरी चांगलीच आहे. सन २०११ ते सन २०१५ या ५ वर्षांदरम्यान जिल्हा न्यायालयात एकूण ९८१ खटले लढले गेले. त्यात तब्बल ७९४ खटल्यांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे; तर फक्त १८७ खटल्यांचा निकाल विरोधात गेला आहे. पालिका इमारतीमधील न्यायालयांमध्ये याच कालावधीत एकूण १ हजार २२० खटल्यांची सुनावणी झाली. त्यातही पालिकेच्या बाजूने १ हजार १६१ खटल्यांचे निकाल लागले. फक्त ५९ निकाल पालिकेच्या विरोधात गेले.सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१५ पासूनची निकालांची आकडेवारीही विधी विभाग चांगले काम करतो आहे असेच दर्शविते. या कालावधीत जिल्हा न्यायालयात एकूण ६८ खटल्यांची सुनावणी झाली. त्यात ५६ निकाल पालिकेच्या बाजूने लागले, तर फक्त १२ निकाल विरोधात गेले. पालिका इमारतीमधील न्यायालयात एकूण ९२ खटले होते. त्यात ८६ निकाल पालिकेच्या बाजूने, तर ६ विरोधात गेले. (प्रतिनिधी) पॅनलवर असणाऱ्या १७ वकिलांचे तसेच मोठ्या खटल्यांसाठी नियुक्त विशेष वकिलांचे मानधन यासाठी या विभागाला मोठा निधी लागतो. असे असतानाही अंदाजपत्रकात या विभागाकडे दुर्लक्ष होते. मागील वर्षी त्यांच्यासाठी फक्त १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद होती. तसेच त्यामुळे विधी विभागाला ५० लाख रुपयांची पुरवणी मागणी करावी लागली. त्याला मंजुरी देतानाही सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर टीका झाली. येत्या आर्थिक वर्षासाठी विधी विभागाने आता ३ कोटी रूपयांची मागणी केली आहे. मात्र, खटल्यांची संख्या लक्षात घेता ही तरतूद अपुरीच आहे, असे विधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.