शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

अपुऱ्या तरतुदीमुळे विधी विभागाची अडचण

By admin | Updated: December 27, 2015 02:06 IST

एकूण खटल्यांपैकी महापालिकेच्या बाजूने निकाल लागणाऱ्या खटल्यांची संख्या जास्त असूनही महापालिकेच्या विधी विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अंदाजपत्रकातही या विभागाकडे

पुणे : एकूण खटल्यांपैकी महापालिकेच्या बाजूने निकाल लागणाऱ्या खटल्यांची संख्या जास्त असूनही महापालिकेच्या विधी विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अंदाजपत्रकातही या विभागाकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे पुरवणी अंदाजपत्रक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.नदीपात्रातील रस्त्यासंदर्भाचा खटला सर्वोच्च न्यायालयात हरल्यामुळे विधी विभागावर टीकेचा सामना करण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या वतीने या खटल्यात कपील सिब्बल, त्यांचा मुलगा व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ३ नामांकित वकील देण्यात आले होते. त्यांची फी काही लाख रुपये होती. त्यांनी पालिकेची बाजू मांडल्यानंतरही निकाल पालिकेच्या विरोधात गेला. मात्र, हा अपवाद वगळता विधी विभागाची एकूण कामगिरी चांगलीच आहे. सन २०११ ते सन २०१५ या ५ वर्षांदरम्यान जिल्हा न्यायालयात एकूण ९८१ खटले लढले गेले. त्यात तब्बल ७९४ खटल्यांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे; तर फक्त १८७ खटल्यांचा निकाल विरोधात गेला आहे. पालिका इमारतीमधील न्यायालयांमध्ये याच कालावधीत एकूण १ हजार २२० खटल्यांची सुनावणी झाली. त्यातही पालिकेच्या बाजूने १ हजार १६१ खटल्यांचे निकाल लागले. फक्त ५९ निकाल पालिकेच्या विरोधात गेले.सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१५ पासूनची निकालांची आकडेवारीही विधी विभाग चांगले काम करतो आहे असेच दर्शविते. या कालावधीत जिल्हा न्यायालयात एकूण ६८ खटल्यांची सुनावणी झाली. त्यात ५६ निकाल पालिकेच्या बाजूने लागले, तर फक्त १२ निकाल विरोधात गेले. पालिका इमारतीमधील न्यायालयात एकूण ९२ खटले होते. त्यात ८६ निकाल पालिकेच्या बाजूने, तर ६ विरोधात गेले. (प्रतिनिधी) पॅनलवर असणाऱ्या १७ वकिलांचे तसेच मोठ्या खटल्यांसाठी नियुक्त विशेष वकिलांचे मानधन यासाठी या विभागाला मोठा निधी लागतो. असे असतानाही अंदाजपत्रकात या विभागाकडे दुर्लक्ष होते. मागील वर्षी त्यांच्यासाठी फक्त १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद होती. तसेच त्यामुळे विधी विभागाला ५० लाख रुपयांची पुरवणी मागणी करावी लागली. त्याला मंजुरी देतानाही सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर टीका झाली. येत्या आर्थिक वर्षासाठी विधी विभागाने आता ३ कोटी रूपयांची मागणी केली आहे. मात्र, खटल्यांची संख्या लक्षात घेता ही तरतूद अपुरीच आहे, असे विधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.