शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नामसाधर्म्यkमुळे पासपोर्ट मिळण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध परिसरात राहणाऱ्या या डॉक्टरांनी पासपोर्टसाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्यासारखेच नाव असलेल्या एकावर खिडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांनी तो मी नव्हेच, असे सांगितले तरीही त्यांना खडकी पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र येईपर्यंत तुमचे चारित्र्य पडताळणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगितले गेले. शेवटी ते स्वत: संबंधित पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तो मी नव्हेच असे सांगितले. त्यानंतर त्यांचे व्हेरिफिकेशन झाले. त्यानंतर पुन्हा पासपाेर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्यावर पुन्हा तोच प्रश्न पुढे आला. पुन्हा तीच प्रक्रिया पूर्ण करायची वेळ त्यांच्यावर आली. आमच्या नावासारखी आणखी नावे आहेत, यात आमचा काय दोष अशी विचारणा ते करताना दिसतात.

चारित्र्य पडताळणीत सारखे नाव असल्याने व्हेरिफिकेशनला वेळ होत असल्याने निराश झालेल्या एका तरुणाने बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात हाताची नस कापून घेऊन स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणीत नामसाधर्म्य असल्यामुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत नागरिकांना चारित्र्य पडताळणी करून दिली जाते. त्यात संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांची व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातून संबंधितांवर अन्य पोलीस ठाण्यात कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते किंवा पासपोर्टसाठीचा त्यांचा अर्ज पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. यावेळी अनेकदा शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच नावासारख्या दुस-या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर त्याची माहिती पोलीस रेकॉर्डवर दिसते. त्याची संबंधित पोलीस ठाण्यातून शहानिशा केल्यावरच खात्री झाल्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.

----------------------

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारित्र्य पडताळणीचे अर्ज ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, काही अडचणी नसल्यास अनेकांना ८ ते १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. जर संबंधित नागरिकाच्या नावासारखेच नाव असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर, त्याची शहानिशा केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. जेथे गुन्हा दाखल आहे, त्या पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी माहिती पाठविली जाते. त्यांच्याकडून संबंधित नागरिक तो नाही, याचे पत्र दिल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. अनेकदा दिवसात ६ ते ७ असे येत असतात. काही दिवस एकही अर्ज नसतो. जर गुन्हा दाखल असतानाही प्रमाणपत्र दिले गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. संबंधित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत असतात. मात्र, त्यांच्याही काही अडचणी असतात, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.