शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

नामसाधर्म्यkमुळे पासपोर्ट मिळण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध परिसरात राहणाऱ्या या डॉक्टरांनी पासपोर्टसाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्यासारखेच नाव असलेल्या एकावर खिडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांनी तो मी नव्हेच, असे सांगितले तरीही त्यांना खडकी पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र येईपर्यंत तुमचे चारित्र्य पडताळणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगितले गेले. शेवटी ते स्वत: संबंधित पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तो मी नव्हेच असे सांगितले. त्यानंतर त्यांचे व्हेरिफिकेशन झाले. त्यानंतर पुन्हा पासपाेर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्यावर पुन्हा तोच प्रश्न पुढे आला. पुन्हा तीच प्रक्रिया पूर्ण करायची वेळ त्यांच्यावर आली. आमच्या नावासारखी आणखी नावे आहेत, यात आमचा काय दोष अशी विचारणा ते करताना दिसतात.

चारित्र्य पडताळणीत सारखे नाव असल्याने व्हेरिफिकेशनला वेळ होत असल्याने निराश झालेल्या एका तरुणाने बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात हाताची नस कापून घेऊन स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणीत नामसाधर्म्य असल्यामुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत नागरिकांना चारित्र्य पडताळणी करून दिली जाते. त्यात संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांची व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातून संबंधितांवर अन्य पोलीस ठाण्यात कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते किंवा पासपोर्टसाठीचा त्यांचा अर्ज पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. यावेळी अनेकदा शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच नावासारख्या दुस-या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर त्याची माहिती पोलीस रेकॉर्डवर दिसते. त्याची संबंधित पोलीस ठाण्यातून शहानिशा केल्यावरच खात्री झाल्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.

----------------------

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारित्र्य पडताळणीचे अर्ज ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, काही अडचणी नसल्यास अनेकांना ८ ते १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. जर संबंधित नागरिकाच्या नावासारखेच नाव असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर, त्याची शहानिशा केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. जेथे गुन्हा दाखल आहे, त्या पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी माहिती पाठविली जाते. त्यांच्याकडून संबंधित नागरिक तो नाही, याचे पत्र दिल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. अनेकदा दिवसात ६ ते ७ असे येत असतात. काही दिवस एकही अर्ज नसतो. जर गुन्हा दाखल असतानाही प्रमाणपत्र दिले गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. संबंधित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत असतात. मात्र, त्यांच्याही काही अडचणी असतात, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.