शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

नामसाधर्म्यkमुळे पासपोर्ट मिळण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध परिसरात राहणाऱ्या या डॉक्टरांनी पासपोर्टसाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्यासारखेच नाव असलेल्या एकावर खिडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांनी तो मी नव्हेच, असे सांगितले तरीही त्यांना खडकी पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र येईपर्यंत तुमचे चारित्र्य पडताळणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगितले गेले. शेवटी ते स्वत: संबंधित पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तो मी नव्हेच असे सांगितले. त्यानंतर त्यांचे व्हेरिफिकेशन झाले. त्यानंतर पुन्हा पासपाेर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्यावर पुन्हा तोच प्रश्न पुढे आला. पुन्हा तीच प्रक्रिया पूर्ण करायची वेळ त्यांच्यावर आली. आमच्या नावासारखी आणखी नावे आहेत, यात आमचा काय दोष अशी विचारणा ते करताना दिसतात.

चारित्र्य पडताळणीत सारखे नाव असल्याने व्हेरिफिकेशनला वेळ होत असल्याने निराश झालेल्या एका तरुणाने बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात हाताची नस कापून घेऊन स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणीत नामसाधर्म्य असल्यामुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत नागरिकांना चारित्र्य पडताळणी करून दिली जाते. त्यात संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांची व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातून संबंधितांवर अन्य पोलीस ठाण्यात कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते किंवा पासपोर्टसाठीचा त्यांचा अर्ज पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. यावेळी अनेकदा शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच नावासारख्या दुस-या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर त्याची माहिती पोलीस रेकॉर्डवर दिसते. त्याची संबंधित पोलीस ठाण्यातून शहानिशा केल्यावरच खात्री झाल्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.

----------------------

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारित्र्य पडताळणीचे अर्ज ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, काही अडचणी नसल्यास अनेकांना ८ ते १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. जर संबंधित नागरिकाच्या नावासारखेच नाव असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर, त्याची शहानिशा केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. जेथे गुन्हा दाखल आहे, त्या पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी माहिती पाठविली जाते. त्यांच्याकडून संबंधित नागरिक तो नाही, याचे पत्र दिल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. अनेकदा दिवसात ६ ते ७ असे येत असतात. काही दिवस एकही अर्ज नसतो. जर गुन्हा दाखल असतानाही प्रमाणपत्र दिले गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. संबंधित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत असतात. मात्र, त्यांच्याही काही अडचणी असतात, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.