शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील झोपेत असताना बोलले की जागे असताना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक लोकमत ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांना असह्य झाले आहे. आपल्या जागा जास्त आल्या, तरी आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही याची बोचणी त्यांना लागून आहे. या मानसिकतेतून ते बाहेर यायला तयार नाहीत. महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल असे विधान त्यांनी झोपेत असतानाच केले की जागे असताना केले, असा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला.

बारामती येथे शनिवार (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत, तोपर्यंत या सरकारला कसलाही धोका नाही. मराठा आरक्षणाबाबत इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता खबरदारी राज्य सरकार घेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. ते मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करत आहेत. राज्य सरकार सर्वच जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. कोरोनाकाळात शेतीव्यवसायाने देशाचा जीडीपी टिकवला आहे. खरिपाच्या अनुषंगाने शेतीउपयोगी औषधे, अवजारे व खतांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चौकट

परदेशातील लसींना परवानगी द्यावी : अजित पवार

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जेवढ्या अडचणी आल्या त्या अडचणी येऊ नयेत, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परदेशातील लसींना तातडीने परवानगी देण्यात यावी, तसेच या लसी मिळवण्यासाठी केंद्राने प्रयत्न केले तर लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव आला आहे. ज्या त्या भागातील रुग्णांनी आपापल्या भागात उपचार घेतल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. मात्र, कोणत्याही भागातील रुग्ण कोठेही उपचार घेऊ शकतात. तो रुग्णाचा अधिकार आहे. त्यामुळे या साथरोगावर दर्जेदार उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग व शासन सकारात्मक आहे, असेही या वेळी पवार म्हणाले.

---------------------------