शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

चंद्रकांत पाटील झोपेत असताना बोलले की जागे असताना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक लोकमत ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांना असह्य झाले आहे. आपल्या जागा जास्त आल्या, तरी आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही याची बोचणी त्यांना लागून आहे. या मानसिकतेतून ते बाहेर यायला तयार नाहीत. महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल असे विधान त्यांनी झोपेत असतानाच केले की जागे असताना केले, असा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला.

बारामती येथे शनिवार (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत, तोपर्यंत या सरकारला कसलाही धोका नाही. मराठा आरक्षणाबाबत इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता खबरदारी राज्य सरकार घेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. ते मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करत आहेत. राज्य सरकार सर्वच जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. कोरोनाकाळात शेतीव्यवसायाने देशाचा जीडीपी टिकवला आहे. खरिपाच्या अनुषंगाने शेतीउपयोगी औषधे, अवजारे व खतांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चौकट

परदेशातील लसींना परवानगी द्यावी : अजित पवार

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जेवढ्या अडचणी आल्या त्या अडचणी येऊ नयेत, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परदेशातील लसींना तातडीने परवानगी देण्यात यावी, तसेच या लसी मिळवण्यासाठी केंद्राने प्रयत्न केले तर लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव आला आहे. ज्या त्या भागातील रुग्णांनी आपापल्या भागात उपचार घेतल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. मात्र, कोणत्याही भागातील रुग्ण कोठेही उपचार घेऊ शकतात. तो रुग्णाचा अधिकार आहे. त्यामुळे या साथरोगावर दर्जेदार उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग व शासन सकारात्मक आहे, असेही या वेळी पवार म्हणाले.

---------------------------