शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वेळीच म्युकरमायकोसिसचे निदान झाल्यास वाचेल रुग्णाचा प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST

आज जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेवर कोरोना संसर्गाचा ताण असताना, भारतासारख्या विकसनशील देशात म्युकरमायकोसिस, काळी बुरशीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात ...

आज जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेवर कोरोना संसर्गाचा ताण असताना, भारतासारख्या विकसनशील देशात म्युकरमायकोसिस, काळी बुरशीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. म्युकरमायकोसिसचा आजार हा एक बुरशीचा आजार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत असते. कोरोना संसर्ग बरा करण्यासाठी स्टिराॅइड्सचा वापर करावा लागतो. ज्या रुग्णांना मधुमेहासारखा आजार आहे, त्यांना का‌ळ्या बुरशीचा आजार होण्याचा धोका जास्त आहे. अचानक दात हलण्यास सुरुवात होणे, दात दुखणे, डोळ्यांवर सुज येणे, पाणी येणे, दातामधून पू येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, नाकाजवळील गालावरच्या भागावर सुज येणे

अशी बरीच ह्या आजाराची लक्षणे आहेत.

कोरोना संसर्ग होऊन एक महिन्यामध्येच काळ्या बुरशीचा आजार झालेली एक महिला हर्डिकर हाॅस्पिटल येथे दाखल झाली. तोंडाचा एक्सरे, स्कॅन, दाताची तपासणी करण्यात आली व रुग्णाला काळ्या बुरशीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डाॅ. लक्ष्मण माळकुंजे (एम.डी.एस, ओरल सर्जन) व त्यांना मदतनीस म्हणून डाॅ. प्रतीक यांनी शस्त्रक्रिया केली.

डाॅ. सचिन नागापूरकर यांनीही यामध्ये जातीने लक्ष दिले. लवकर निदान, अचूक उपचार केले तर आजार बरा होऊ शकतो. परंतु, निदान व उपचार यामध्ये विलंब झाला तर रुग्णाला डोळा गमवावा लागू शकतो, हा संसर्ग मेंदूत गेला तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कोरोना संसर्ग झालेल्या व होऊन गेलेल्या रुग्णांनी कोणताही त्रास झाल्यास तत्काळ उपचार सुरू करावेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

-----

पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले असून, कोरोनानंतर या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी, यावर परिणाम होऊन काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन एस.ओ.पी. तयार केली पाहिजे. कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस वाचवण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन (मुख शल्य चिकित्सक) नाक - कान- घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान -उपचार -पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्त्वाचे योगदान देऊन रुग्णाचा प्राण वाचवू शकतात.

- डॉ. जे. बी. गार्डे, दंतशल्यचिकित्सक, मॅक्सिलोफेशियल विभागप्रमुख, एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय