शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

धानवलीला भीती माळीणच्या पुनरावृत्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

भोर : कालपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे धानवली (ता. भोर) गावातील घरांजवळ डोंगरातील मोठमोठ्या दरडी वाहुन आल्या आहेत. ...

भोर : कालपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे धानवली (ता. भोर) गावातील घरांजवळ डोंगरातील मोठमोठ्या दरडी वाहुन आल्या आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी माळीण सारखी परिस्थिती होऊ शकते. धानवली रस्त्यावरील पुल वाहुन गेला असुन गावाजवळच्या ओढयाला पुर आल्याने संपुर्ण गावाचा संर्पक तुटलेला आहे. यामुळे गावात भितीचे वातावरण असुन धानवली गावाचे इतर ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी डोंगरकपारीत वरची धानवली येथे २० ते २५ कुटुंबे राहतात. ना रस्ता ना पाणी ना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी पडल्याने घरांना व लोकांना धोका निर्माण झालेला आहे. खालच्या धानवलीत ४० ते ५० कुटुंबे राहात असुन कालच्या पावसामुळे मोठमोठे दगडगोटे घरांजवळ येऊन थांबले आहेत. यामुळे भात, नाचणीची शेती भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळयात गावात भितीचे वातावरण तयार होते. याबाबत वारवार शासनाकडे मागणी करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. कंकवाडी ते धानवली या अडीच किलोमीटर रस्त्यावरील तीन ठिकाणचे पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेले आहे. धानवली गावाजवळ असलेल्या मोठ्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने गावाचा संर्पक तुटलेला आहे. दरम्यान तहसिलदार अजित पाटील, मंडलअधिकारी लहारे तलाठी यांनी धानवली गावाला भेट दिली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना गावात जाता आले नाही. येथील नागरीकांना प्रशासनासह इतर लोकांनी मदत करण्याचे आवाहन तहसिलदार आजित पाटील यांनी केले आहे.

चौकट

धोकादायक गाव असुनही गावाचे पुर्नवसन नाही

रायरेश्वर किल्याच्या खाली असलेले धानवली गाव शासनाने धोकादायक म्हणून जाहिर केलेले आहे. त्यासाठी गावात संरक्षक भिंत घालण्यासाठी मागिल दोन वर्षापासुन निधी मंजूर आहे. मात्र. संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. काल पासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने घरांजवळ दरडी पडल्याने गावाचा धोका अधिकच वाढला आहे. गावात भितीचे वातावरण

आहे. यामुळे धानवली गावातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.

फोटो आहे :