शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

धानवलीला भीती माळीणच्या पुनरावृत्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

भोर : कालपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे धानवली (ता. भोर) गावातील घरांजवळ डोंगरातील मोठमोठ्या दरडी वाहुन आल्या आहेत. ...

भोर : कालपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे धानवली (ता. भोर) गावातील घरांजवळ डोंगरातील मोठमोठ्या दरडी वाहुन आल्या आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी माळीण सारखी परिस्थिती होऊ शकते. धानवली रस्त्यावरील पुल वाहुन गेला असुन गावाजवळच्या ओढयाला पुर आल्याने संपुर्ण गावाचा संर्पक तुटलेला आहे. यामुळे गावात भितीचे वातावरण असुन धानवली गावाचे इतर ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी डोंगरकपारीत वरची धानवली येथे २० ते २५ कुटुंबे राहतात. ना रस्ता ना पाणी ना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी पडल्याने घरांना व लोकांना धोका निर्माण झालेला आहे. खालच्या धानवलीत ४० ते ५० कुटुंबे राहात असुन कालच्या पावसामुळे मोठमोठे दगडगोटे घरांजवळ येऊन थांबले आहेत. यामुळे भात, नाचणीची शेती भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळयात गावात भितीचे वातावरण तयार होते. याबाबत वारवार शासनाकडे मागणी करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. कंकवाडी ते धानवली या अडीच किलोमीटर रस्त्यावरील तीन ठिकाणचे पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेले आहे. धानवली गावाजवळ असलेल्या मोठ्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने गावाचा संर्पक तुटलेला आहे. दरम्यान तहसिलदार अजित पाटील, मंडलअधिकारी लहारे तलाठी यांनी धानवली गावाला भेट दिली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना गावात जाता आले नाही. येथील नागरीकांना प्रशासनासह इतर लोकांनी मदत करण्याचे आवाहन तहसिलदार आजित पाटील यांनी केले आहे.

चौकट

धोकादायक गाव असुनही गावाचे पुर्नवसन नाही

रायरेश्वर किल्याच्या खाली असलेले धानवली गाव शासनाने धोकादायक म्हणून जाहिर केलेले आहे. त्यासाठी गावात संरक्षक भिंत घालण्यासाठी मागिल दोन वर्षापासुन निधी मंजूर आहे. मात्र. संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. काल पासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने घरांजवळ दरडी पडल्याने गावाचा धोका अधिकच वाढला आहे. गावात भितीचे वातावरण

आहे. यामुळे धानवली गावातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.

फोटो आहे :