शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी निकराचा लढा देणार : ढमाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST

मुळशी : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे टाटा कंपनी व सरकारच्या विरोधात धरणग्रस्तांनी वेळोवेळी आंदोलने करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी ...

मुळशी : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे टाटा कंपनी व सरकारच्या विरोधात धरणग्रस्तांनी वेळोवेळी आंदोलने करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु निर्ढावलेल्या टाटा कंपनीला व सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. मुळशी सत्याग्रहाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली तरी धरणग्रस्तांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. यापुढील काळात टाटा कंपनी व सरकारने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आम्हाला नाइलाजाने टाटा कंपनीच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलावे लागेल आतापर्यंत अहिंसेच्या मार्गाने झालेले आंदोलन यापुढे वेळ पडली तर हिंसेच्या मार्गाने पुढे न्यावे लागेल, असे मत मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी व्यक्त केले. ते माले येथील सेनापती बापट स्मृती स्तंभाजवळ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते मुळशी धरण सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१६ एप्रिल १९२१ रोजी देशातील पहिला सत्याग्रह मुळशीत सुरू झाला. मुळशी सत्याग्रह नावाने जगप्रसिद्ध सत्याग्रहाची शताब्दी पूर्ती शुक्रवारी मुळशीतील माले गावात धरणग्रस्तांकडून मानवंदना देत साजरी करण्यात आली. यावेळी मुळशी सत्याग्रह चिरायू होवो, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणेने धरण परिसर दुमदुमला होता. माले येथील सेनापती बापट स्मृतिस्तंभ परिसर येथे सेनापती बापट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुळी सत्याग्रह पर्व दुसरे सुरू करण्यात आले. तसेच टाटा तलाव येथे जाऊन मुळशी सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या मुळशी धरणग्रस्त तसेच शेतकरी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुळशी सत्याग्रह मासिकाचे प्रकाशन मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले, मुळशी तालुका पंचायत समिती माजी सभापती रवींद्र ऊर्फ बाबा कंधारे, महावार्ता न्यूज पोर्टलचे संपादक संजय दुधाणे, राष्ट्रवादीचे शरद शेंडे, एकनाथ दिघे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. सेनापती बापट स्मृतिस्तंभाजवळ माजी आमदार शरद ढमाले, माजी सभापती बाबा कंधारे, पत्रकार संजय दुधाणे व शरद शेंडे यांनी मुळशी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी धरण विकास मंडळ अध्यक्ष गणपत वाशिवले, माजी सरपंच अनिल अधवडे, अविनाश कानगुडे, माजी सरपंच एकनाथ दिघे, परशुराम वाघचौरे, जयराम दिघे, सचिन पळसकर, संतोष कदम, दत्ता दिघे, अनिल मापाटी, सुहास शेंडे, हनुमंत शेंडे, विजय काळोखे तसेच मुळशी धरण विभाग विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जेव्हा कार्यकर्त्याचा मोबाईल धरणात पडतो तेव्हा

सत्याग्रहींना धरणाच्या पाण्यात उतरून पुष्पांजली अर्पण करीत असतानाच धरणात पदाधिकारी हनुमंत सुर्वे यांचा मोबाईल पाण्यात पडला असता क्षणांचा विचार न करता मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी मुळशी धरणात घेतली उडी आणि मोबाईल बाहेर काढला. मोबाईल बाहेर काढताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून ढमाले यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

माले येथे मुळशी धरणाच्या पाण्यात उतरून सत्याग्रह सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या सत्याग्रहींना पुष्पांजली अर्पण करताना लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त बांधव.