शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘देवपाल’मुळे पाणीप्रश्न सुटेल

By admin | Updated: October 11, 2014 06:56 IST

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे

भोर : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ७ गावांतील सुमारे ४५० ते ५०० एकर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येऊन गावातील पाणीटंचाई दूर होणार आहे. या लघुपाटबंधारे तलावामुळे बाधित होणाऱ्या जमिनींचा मोबदला व शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून, भरपाई दिली जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.आमदार थोपटे यांनी वेल्हे तालुक्यातील वाजेघर, लव्ही आवळी, दादवडी, मेरावणे, फणशी, साखर, घावर, चिरमोडी, सुरवड, भागिनघर, मंजाईआसनी, दामगुडाअसनी, कोदवडी, वडगावझांजे सोडे या गावांत प्रचार दौरा केला. या वेळी ते देवपाल येथे बोलत होते.या वेळी सभापती सविता वाडघरे, दिलीप लोहकरे, चंद्रकांत शेडकर, सुषमा रेणुसे, वसुधा नलावडे, शोभा जाधव,गणपतराव रेणुसे, भाऊ दसवडकर, बाळासो शिळीमकर, माऊली खाटपे, शिवाजी येनपुरे, काळुराम पिलावरे, मोहन शिळीमकर, शिवाजी चहाटे, संतोष भोसले, सूर्यकांत भोसले, उत्तम रेणुसे, विलास रांजणे, बाळू भरम, भगवान शिदे, आण्णासो रांजणे उपस्थित होते. थोपटे म्हणाले, की सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधाऱ्यामुळे ५० दशलक्ष घन मीटर पाणी साचणार आहे. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे. त्याचा मोबदला लवकरच मिळेल. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर डोंगरावर बंद पाइपने पाणी नेऊन सायफन पद्धतीने पाणी आणून शेती पिकवली जाणार आहे. त्यामुळे वीजबिल येणार नाही. बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला.०