शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

तरुणांच्या हाती विकासाचा गाडा

By admin | Updated: February 25, 2017 02:17 IST

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याने पुणे जिल्हा परिषदेस पाच नवे तरुणतुर्क सदस्य दिले आहेत. या सर्वांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली

बारामती/इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याने पुणे जिल्हा परिषदेस पाच नवे तरुणतुर्क सदस्य दिले आहेत. या सर्वांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. त्यामध्ये अभिजित तांबिले यांचे वय फक्त २२ वर्षाचे आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. पारंपरिक प्रश्नांबरोबरच शाळांचे आधुनिकीकरण, तांत्रिक शिक्षणाची गोडी निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे या तरुण सदस्यांनी सांगितले.बारामती तालुक्यातून ३२व्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिर्सुफळ-गुणवडी गटातून निवडून आलेले रोहित राजेंद्र पवार यांना कंपनी व्यवस्थापनाचा अनुभव आहे. अगदी कमी वयात त्यांनी व्यवसाय संभाळला आहे. एका साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत असताना खासगी साखर कारखान्यांच्या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या संदर्भात सांगितले की, जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा देणारी संस्था आहे. ग्रामीण भाग, ग्रामीण जनता या संस्थेशी जोडलेली आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला बालकल्याण, बांधकाम आदींच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जिल्हा परिषदेची नाळ जोडलेली आहे. त्यामध्ये दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील शाळांमधून कसे मिळेल, तेथे सुविधा कशा देता येतील, नागरिकांचे प्रश्न हेलपाटे न मारता मार्गी कसे लागतील, यावरच लक्ष दिले जाईल. प्रवीण माने हे औद्योगिक व्यवस्थापनाचा गाढा अनुभव असलेले,लोकांना आपणाकडून काय अपेक्षित आहे, आपणास नेमके काय करायचे आहे याची पक्की जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण तालुका विशेषत: पळसदेव बिजवडी गटात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. संवाद साधण्याच्या वृत्तीमुळे या भागात असणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल बाबींची, सामाजिक सार्वजनिक समस्यांची त्यांना माहिती आहे. त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा त्यांच्या मनात अगदी नक्की आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना प्रवीण माने यांनी सांगितले, या भागातील समस्या सोडवताना त्यांच्या मुळाशी जाण्याचा आपला प्रयत्न रहाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या सर्व सामूहिक, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू. याशिवाय आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदींचा प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. पळसदेव-बिजवडी गटातील जनतेच्या निगडित सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.लासुर्णे : या गटात असणाऱ्या समस्या प्रामुख्याने सोडविल्या जातील. या गटातील जनतेने मतदान करून जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास सागर भोसले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांना विकासातून न्याय देण्याचे काम करणार आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून लासुर्णे व सणसर येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणींवर भर दिला जाणार आहे. लासुर्णे व सणसर भागातील रस्ते, वीज, पाणी या अडचणी सुरूवातीला सोडविल्या जातील. या गटात असणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अडचणी जाणून घेऊन शाळेतील पटसंख्या वाढविण्यावर भर देऊन दर्जा सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. या भागातील बऱ्याच ठिकाणी अजूनही पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. बऱ्याच भागात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच प्रवास करताना कळत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल.