शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

देऊळगावगाडा येथे टंचाई आराखड्यातून विकासकामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

जिल्हा नियोजन समितीच्या जलसंधारण विभागाच्या टंचाई आराखड्यातून ६ लाख ६० हजार रुपये विकास निधी देण्यात आला आहे. टंचाई आराखड्यातून ...

जिल्हा नियोजन समितीच्या जलसंधारण विभागाच्या टंचाई आराखड्यातून ६ लाख ६० हजार रुपये विकास निधी देण्यात आला आहे. टंचाई आराखड्यातून दुष्काळ निवारण योजनेच्या माध्यमातून देऊळगावगाडा ग्रामपंचायतीला विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून विहिरींचे खोलीकरण करणे, गाळ काढणे ही कामे करण्यात आली आहेत. या खोलीकरणाच्या माध्यमातून विहीर पुनर्भरण होऊन पाणीसाठ्यात वाढ होऊन आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. गावातील असलेल्या ओढ्यालगतचे बंधारे दुरुस्तीची कामे देखील ग्रामपंचायतीने या निधीच्या माध्यमातून हाती घेतली आहेत. नवीन बंधारे बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, की वॉल बदलणे, पिचिंग, भराव बांधणे इत्यादी कामे ही या योजनेच्या माध्यमातून शितोळे वस्ती, आठजन वस्ती, बारवकर-मोरे वस्ती, शिंदे वस्ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.

२६खोर

देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून विकास कामे सुरू केली.