शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

भाजपाच्या डोळ्यांसमोर ‘विकास’ की ‘निवडणुका’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST

पुणे : पालिकेच्या निवडणुकांना अवघे एक वर्ष शिल्लक राहिल्यानेच भाजपाकडून महापालिकेत नेत्यांच्या आढावा बैठका सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीला ...

पुणे : पालिकेच्या निवडणुकांना अवघे एक वर्ष शिल्लक राहिल्यानेच भाजपाकडून महापालिकेत नेत्यांच्या आढावा बैठका सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीला ‘विकासा’चे गोंडस नाव दिले जात असून, या दौऱ्यांमधून काहीही साध्य होणार नसल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरु केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पालिकेमध्ये अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, जायका, नदी सुधार प्रकल्प, समाविष्ट ११ गावांमधील मलनि:स्सारण प्रकल्प, चांदणी चौक उड्डाणपूल, नाला पूरनियंत्रण, वैद्यकीय महाविद्यालय आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीची प्रशासकीय चर्चा होण्यापेक्षा राजकीय चर्चाच अधिक झाली.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट उपस्थित नसल्याचीही चर्चा झाली. चार वर्षात महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात सपशेल अपयश आले असून फडणवीस यांच्या दौ-यामुळे प्रकल्पांना कितपत गती मिळेल हा प्रश्न आहे. प्रकल्पांना गती देण्यापेक्षा निवडणुकीची तयारी हाच मुख्य उद्देश असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

====

आगामी वर्षात निवडणुका आहेत. त्यादृष्टीने विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झालेला आहे. पुणेकरांची काळजी असती तर चार वर्षात हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असते. ज्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला त्यातील बहुतांश प्रकल्प राष्ट्रवादीच्याच काळातील आहेत. हा केवळ दिखावा आहे. परंतु, यामुळे पुणेकर भुलणार नाहीत.

- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

====

पालिकेत भाजपाची सत्ता असतानाही त्यांच्या प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि खासदारांना पालिकेत येऊन आढावा बैठक घ्यावी लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल. भाजपात सर्वकाही आलबेल नाही. चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी कोण घेणार?

- आबा बागुल, गटनेते, कॉंग्रेस

====

गेल्या चार वर्षात भाजपाला राज्यात सत्ता असूनही प्रकल्प मार्गी लावता आलेले नाहीत. विकासकामे नव्हे तर निवडणुका हाच अजेंडा आहे. पालिका-राज्य-केंद्रात सत्ता असताना जाहिरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली. शहराचा किती विकास झाला हे तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची गरज आहे. भाजपाचा आणि विकासाचा काहीही संबंध नाही.

- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना