शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या डोळ्यांसमोर ‘विकास’ की ‘निवडणुका’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST

पुणे : पालिकेच्या निवडणुकांना अवघे एक वर्ष शिल्लक राहिल्यानेच भाजपाकडून महापालिकेत नेत्यांच्या आढावा बैठका सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीला ...

पुणे : पालिकेच्या निवडणुकांना अवघे एक वर्ष शिल्लक राहिल्यानेच भाजपाकडून महापालिकेत नेत्यांच्या आढावा बैठका सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीला ‘विकासा’चे गोंडस नाव दिले जात असून, या दौऱ्यांमधून काहीही साध्य होणार नसल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरु केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पालिकेमध्ये अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, जायका, नदी सुधार प्रकल्प, समाविष्ट ११ गावांमधील मलनि:स्सारण प्रकल्प, चांदणी चौक उड्डाणपूल, नाला पूरनियंत्रण, वैद्यकीय महाविद्यालय आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीची प्रशासकीय चर्चा होण्यापेक्षा राजकीय चर्चाच अधिक झाली.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट उपस्थित नसल्याचीही चर्चा झाली. चार वर्षात महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात सपशेल अपयश आले असून फडणवीस यांच्या दौ-यामुळे प्रकल्पांना कितपत गती मिळेल हा प्रश्न आहे. प्रकल्पांना गती देण्यापेक्षा निवडणुकीची तयारी हाच मुख्य उद्देश असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

====

आगामी वर्षात निवडणुका आहेत. त्यादृष्टीने विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झालेला आहे. पुणेकरांची काळजी असती तर चार वर्षात हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असते. ज्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला त्यातील बहुतांश प्रकल्प राष्ट्रवादीच्याच काळातील आहेत. हा केवळ दिखावा आहे. परंतु, यामुळे पुणेकर भुलणार नाहीत.

- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

====

पालिकेत भाजपाची सत्ता असतानाही त्यांच्या प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि खासदारांना पालिकेत येऊन आढावा बैठक घ्यावी लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल. भाजपात सर्वकाही आलबेल नाही. चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी कोण घेणार?

- आबा बागुल, गटनेते, कॉंग्रेस

====

गेल्या चार वर्षात भाजपाला राज्यात सत्ता असूनही प्रकल्प मार्गी लावता आलेले नाहीत. विकासकामे नव्हे तर निवडणुका हाच अजेंडा आहे. पालिका-राज्य-केंद्रात सत्ता असताना जाहिरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली. शहराचा किती विकास झाला हे तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची गरज आहे. भाजपाचा आणि विकासाचा काहीही संबंध नाही.

- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना