शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विकसनशील बारामतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रशांत ननवरे बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने ...

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची

प्रशांत ननवरे

बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. शहराला आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या ५ वर्षांत ७ आॅगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमत असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो, याचे संशोधन होण्याची गरज आहे. शहराच्या विकासात शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एकूण परिस्थितीनुसार या अधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अगदी सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी पोचत पवार व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची, दर्जाची पाहणी करीत आहेत. मात्र,सातत्याने बदलून जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या शहर विकसनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली ही गावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये बारामती शहरातील आनंदनगर, सूर्यनगरी, तांदूळवाडी, कटफळ, सटवाजीनगर, अमराई आदी भाग आहे. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाला अनेक ठिकाणी निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेतील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेत निर्णयप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका अनेक दैनंदिन कामाला बसत आहे. आजाराची टांगती तलवार असताना याच कठीण काळात गेल्या ५० दिवसांपासून बारामती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविना कारभार हाकत आहे.

चौकट

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत असेल. गेल्या पाच वर्षांत बदलून गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती पाहता ही चिंतेपेक्षा चिंतनाची बाब आहे.

———————————————

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’

राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षांचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.