शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

विकसनशील बारामतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रशांत ननवरे बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने ...

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची

प्रशांत ननवरे

बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. शहराला आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या ५ वर्षांत ७ आॅगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमत असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो, याचे संशोधन होण्याची गरज आहे. शहराच्या विकासात शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एकूण परिस्थितीनुसार या अधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अगदी सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी पोचत पवार व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची, दर्जाची पाहणी करीत आहेत. मात्र,सातत्याने बदलून जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या शहर विकसनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली ही गावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये बारामती शहरातील आनंदनगर, सूर्यनगरी, तांदूळवाडी, कटफळ, सटवाजीनगर, अमराई आदी भाग आहे. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाला अनेक ठिकाणी निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेतील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेत निर्णयप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका अनेक दैनंदिन कामाला बसत आहे. आजाराची टांगती तलवार असताना याच कठीण काळात गेल्या ५० दिवसांपासून बारामती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविना कारभार हाकत आहे.

चौकट

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत असेल. गेल्या पाच वर्षांत बदलून गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती पाहता ही चिंतेपेक्षा चिंतनाची बाब आहे.

———————————————

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’

राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षांचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.