शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

विकसनशील बारामतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रशांत ननवरे बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने ...

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची

प्रशांत ननवरे

बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. शहराला आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या ५ वर्षांत ७ आॅगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमत असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो, याचे संशोधन होण्याची गरज आहे. शहराच्या विकासात शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एकूण परिस्थितीनुसार या अधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अगदी सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी पोचत पवार व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची, दर्जाची पाहणी करीत आहेत. मात्र,सातत्याने बदलून जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या शहर विकसनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली ही गावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये बारामती शहरातील आनंदनगर, सूर्यनगरी, तांदूळवाडी, कटफळ, सटवाजीनगर, अमराई आदी भाग आहे. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाला अनेक ठिकाणी निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेतील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेत निर्णयप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका अनेक दैनंदिन कामाला बसत आहे. आजाराची टांगती तलवार असताना याच कठीण काळात गेल्या ५० दिवसांपासून बारामती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविना कारभार हाकत आहे.

चौकट

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत असेल. गेल्या पाच वर्षांत बदलून गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती पाहता ही चिंतेपेक्षा चिंतनाची बाब आहे.

———————————————

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’

राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षांचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.