शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विकसनशील बारामतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रशांत ननवरे बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने ...

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची

प्रशांत ननवरे

बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. शहराला आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या ५ वर्षांत ७ आॅगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमत असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो, याचे संशोधन होण्याची गरज आहे. शहराच्या विकासात शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एकूण परिस्थितीनुसार या अधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अगदी सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी पोचत पवार व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची, दर्जाची पाहणी करीत आहेत. मात्र,सातत्याने बदलून जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या शहर विकसनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली ही गावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये बारामती शहरातील आनंदनगर, सूर्यनगरी, तांदूळवाडी, कटफळ, सटवाजीनगर, अमराई आदी भाग आहे. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाला अनेक ठिकाणी निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेतील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेत निर्णयप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका अनेक दैनंदिन कामाला बसत आहे. आजाराची टांगती तलवार असताना याच कठीण काळात गेल्या ५० दिवसांपासून बारामती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविना कारभार हाकत आहे.

चौकट

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत असेल. गेल्या पाच वर्षांत बदलून गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती पाहता ही चिंतेपेक्षा चिंतनाची बाब आहे.

———————————————

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’

राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षांचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.