शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:25 IST

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे.

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे. येथील जनतेवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. या योजनेत या तिनही तालुक्यांचा विचार करून सुधारणा केलीच पाहिजे; अन्यथा पाणी पोहोचू दिले जाणार नाही. याप्रकरणी या प्रकल्पाच्या तीन अधिकाºयांविरुद्ध विधानसभेत विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे दाखल केलेला असून अध्यक्षांनी तो स्वीकारलेला आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.पाणीवाटपाबाबत चुकीच्या अहवालाला विरोध करीत आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार भोर, वेल्हे व हवेली तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नसरापुरातील जनसुनावणी आज रद्द केली, तर या तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींनी या अहवालाच्या विरोधात ठराव दिले. पाणीप्रश्नासाठी पक्ष बाजूला सारून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे गुंजवणी पाणी संघर्ष समितीने आयोजिलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात सर्व जण एकवटले. मेळाव्यास शिवसेनेचे रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, शैलेश वालगुडे, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड, शिवनाना कोंडे, भाजपचे विश्वास ननावरे, सुधीर शेडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास बोरगे, संतोष दसवडकर, दिगंबर चोरघे, बळीराजा शेतकरी संघाचे यशवंत कदम, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, मुरलीधर दळवी यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेगण, शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने हजर होता.येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही केलेले नाही. त्यांचे पुनर्वसन नवीन विमानतळाशेजारी करून दाखवा, त्यावर येथील शेतकºयांचे पुनर्वसन करावे; अन्यथा आमचा बांधवांच्या आम्ही पाठीशी असल्याचा निर्धार रमेश कोंडे यांनी जनतेसमोर जाहीर केला, तर शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे म्हणाले, की या धरणाकरिता येथील सुजाण नागरिकांनी या धरणाकरिता आपल्या जमिनी दिल्या हा त्याग मोठा नाही का? या धरणासाठी शिवसेनेने काम सुरू करून या जलसंपदामंत्र्यांनी धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले. असे असतानाही या जनतेच्या पाण्यावरील हक्काला वंचित राहू देणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या वेळी माजी उपसभापती विक्रम खुटवड, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे यांचीही भाषणे झाली. मनसेचे विलास बोरगे, भाजपाचे विश्वास ननावरे यांनी पाठिंबा दिला. दिलीप बाठे यांनी सूत्रसंचालन केले. मदन खुटवड यांनी आभार मानले.