शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:25 IST

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे.

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे. येथील जनतेवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. या योजनेत या तिनही तालुक्यांचा विचार करून सुधारणा केलीच पाहिजे; अन्यथा पाणी पोहोचू दिले जाणार नाही. याप्रकरणी या प्रकल्पाच्या तीन अधिकाºयांविरुद्ध विधानसभेत विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे दाखल केलेला असून अध्यक्षांनी तो स्वीकारलेला आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.पाणीवाटपाबाबत चुकीच्या अहवालाला विरोध करीत आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार भोर, वेल्हे व हवेली तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नसरापुरातील जनसुनावणी आज रद्द केली, तर या तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींनी या अहवालाच्या विरोधात ठराव दिले. पाणीप्रश्नासाठी पक्ष बाजूला सारून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे गुंजवणी पाणी संघर्ष समितीने आयोजिलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात सर्व जण एकवटले. मेळाव्यास शिवसेनेचे रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, शैलेश वालगुडे, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड, शिवनाना कोंडे, भाजपचे विश्वास ननावरे, सुधीर शेडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास बोरगे, संतोष दसवडकर, दिगंबर चोरघे, बळीराजा शेतकरी संघाचे यशवंत कदम, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, मुरलीधर दळवी यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेगण, शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने हजर होता.येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही केलेले नाही. त्यांचे पुनर्वसन नवीन विमानतळाशेजारी करून दाखवा, त्यावर येथील शेतकºयांचे पुनर्वसन करावे; अन्यथा आमचा बांधवांच्या आम्ही पाठीशी असल्याचा निर्धार रमेश कोंडे यांनी जनतेसमोर जाहीर केला, तर शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे म्हणाले, की या धरणाकरिता येथील सुजाण नागरिकांनी या धरणाकरिता आपल्या जमिनी दिल्या हा त्याग मोठा नाही का? या धरणासाठी शिवसेनेने काम सुरू करून या जलसंपदामंत्र्यांनी धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले. असे असतानाही या जनतेच्या पाण्यावरील हक्काला वंचित राहू देणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या वेळी माजी उपसभापती विक्रम खुटवड, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे यांचीही भाषणे झाली. मनसेचे विलास बोरगे, भाजपाचे विश्वास ननावरे यांनी पाठिंबा दिला. दिलीप बाठे यांनी सूत्रसंचालन केले. मदन खुटवड यांनी आभार मानले.