शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:25 IST

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे.

नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे. येथील जनतेवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. या योजनेत या तिनही तालुक्यांचा विचार करून सुधारणा केलीच पाहिजे; अन्यथा पाणी पोहोचू दिले जाणार नाही. याप्रकरणी या प्रकल्पाच्या तीन अधिकाºयांविरुद्ध विधानसभेत विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे दाखल केलेला असून अध्यक्षांनी तो स्वीकारलेला आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.पाणीवाटपाबाबत चुकीच्या अहवालाला विरोध करीत आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार भोर, वेल्हे व हवेली तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नसरापुरातील जनसुनावणी आज रद्द केली, तर या तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींनी या अहवालाच्या विरोधात ठराव दिले. पाणीप्रश्नासाठी पक्ष बाजूला सारून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे गुंजवणी पाणी संघर्ष समितीने आयोजिलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात सर्व जण एकवटले. मेळाव्यास शिवसेनेचे रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, शैलेश वालगुडे, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड, शिवनाना कोंडे, भाजपचे विश्वास ननावरे, सुधीर शेडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास बोरगे, संतोष दसवडकर, दिगंबर चोरघे, बळीराजा शेतकरी संघाचे यशवंत कदम, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, मुरलीधर दळवी यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेगण, शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने हजर होता.येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही केलेले नाही. त्यांचे पुनर्वसन नवीन विमानतळाशेजारी करून दाखवा, त्यावर येथील शेतकºयांचे पुनर्वसन करावे; अन्यथा आमचा बांधवांच्या आम्ही पाठीशी असल्याचा निर्धार रमेश कोंडे यांनी जनतेसमोर जाहीर केला, तर शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे म्हणाले, की या धरणाकरिता येथील सुजाण नागरिकांनी या धरणाकरिता आपल्या जमिनी दिल्या हा त्याग मोठा नाही का? या धरणासाठी शिवसेनेने काम सुरू करून या जलसंपदामंत्र्यांनी धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले. असे असतानाही या जनतेच्या पाण्यावरील हक्काला वंचित राहू देणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या वेळी माजी उपसभापती विक्रम खुटवड, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे यांचीही भाषणे झाली. मनसेचे विलास बोरगे, भाजपाचे विश्वास ननावरे यांनी पाठिंबा दिला. दिलीप बाठे यांनी सूत्रसंचालन केले. मदन खुटवड यांनी आभार मानले.