शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

By admin | Updated: July 21, 2015 03:07 IST

‘कितने बाजू कितने दम सुनले दुश्मन ध्यान से, हारेंगे ना हम बाजी जितेंगे हम शान से...’ या गाण्याप्रमाणे कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही

पुणे : ‘कितने बाजू कितने दम सुनले दुश्मन ध्यान से, हारेंगे ना हम बाजी जितेंगे हम शान से...’ या गाण्याप्रमाणे कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही, असा पवित्रा ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मोडलेली ‘प्रश्नचिन्हा’ची प्रतिकृती पुन्हा उभारून ‘गांधीगिरी’ने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सोमवारी स्पष्ट केले.‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या ३७व्या दिवशी संस्थेच्या आवारात गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. आंदोलनाचे प्रतीक असलेली ‘एफटीआयआय’च्या प्रवेशद्वाराजवळील प्रश्नचिन्हाची प्रतिकृती आणि दगड ठेवलेल्या खुर्चीची मोडतोड केल्याचा प्रकार दहा-बारा तरुणांकडून रविवारी रात्री करण्यात आला. या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही मुस्कटदाबीची नांदी असली, तरी विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. माघार घ्यायची नाही असा निर्धार केला आहे.हे प्रकार होतील याची खात्री असल्याने मुन्नाभाई एमबीबीएसच्या ‘गांधीगिरी’ स्टाइलने पुन्हा त्या प्रतिकृती उभारण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. जितक्या वेळा त्या प्रतिकृतींची मोडतोड केली जाईल, तितक्या वेळा त्या पुन्हा उभारल्या जातील, असे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांकडून देण्यात आले. दरम्यान, हा प्रकार संस्थेच्या आवाराबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याची तक्रार कोण करणार, हा मुळात प्रश्न आहे. या मोडतोडी प्रकरणाविरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी दिले. हा अधिकार विद्यार्थ्यांचा नव्हे, संचालकांचा आहे असे स्पष्ट करीत संचालकांच्याच कोर्टात विद्यार्थ्यांनी चेंडू टाकला आहे. (प्रतिनिधी)