शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रदूषणामुळे माशांचे अस्तित्व नष्ट, मुळा नदी स्वच्छता अभियानातर्फे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:21 IST

मुळा नदी प्रदूषणात वाढ झाल्याने माशांचे अनेक प्रकार सध्या आढळत नसल्याची धक्कादायक बाब परिसरातील मुळा नदी स्वच्छता अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे.

बाणेर : मुळा नदी प्रदूषणात वाढ झाल्याने माशांचे अनेक प्रकार सध्या आढळत नसल्याची धक्कादायक बाब परिसरातील मुळा नदी स्वच्छता अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक माशांचे अस्तित्व नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झाले आहे. मुळा नदीपात्रात बाणेर एसटीपी प्लॅन्टजवळ; तसेच औंध स्पायसर पुलाजवळ नदीपात्रामध्ये थेटमैलापाणी सोडण्यात येत आहे. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. प्रदूषणाची वाढ होत असल्यामुळे जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.>मुळा नदी स्वच्छता अभियान अंतर्गत पाण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये नदी प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनक रितीने कमी होत आहे. प्रदूषणात वाढ झाल्यास नदी मृत होईल, यासाठी सक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत.- शैलजा देशपांडेनदी स्वच्छता अभियानचे कार्यकर्ते>मासेमारीवर मोठा परिणामआठ ते दहा वर्षांपूर्वी औंध परिसरात नदीपात्रामध्ये २० ते २४ प्रकारचे मासे सापडत होते. औंध परिसरातील कोळी समाजातील अनेक नागरिक या परिसरात मासेमारीचा व्यवसाय करत होते.सध्या केवळ दोन प्रकारचे मासे आढळतात. प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न,नदीपात्रातील प्रदूषण वाढल्याने अनेक समस्या वाढल्या आहेत.नदीपात्रालगत कचरा टाकण्यात येत आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, तर प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीची समस्यादेखील निर्माण होत आहे. जलपर्णी वारंवार वाढत असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे.जैवविविधतेला धोका-मुळानदी पात्रालगत अनेक पक्षी, प्राणी पाहायला मिळत होते. नदीमध्ये मासे पकडण्यासाठी येणाºया पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे.>नदीपात्रात मैैलापाणीनदीपात्रालगत पूर्वी आढळणारे अनेक जीव शहरीकरण व प्रदूषणामुळे दुर्मिळ झाले आहेत. औंधलगत असलेल्या संरक्षण खात्याच्या जागेत प्रदूषण तुलनेने कमी आहेत.या परिसरात काही प्रमाणात जैवविविधता पाहायाला मिळत आहे. परंतु, शहरीकरण झालेल्या भागात जैवविविधतेचे प्रमाण कमी होत आहे.मैलापाणी थेट नदीपात्रात- बाणेर एसटीपी प्लॅन्टजवळ मुळा नदीपात्रात अनेकदा सकाळी सात ते दहा दरम्यान लाखो लिटर मैलापाणी सोडण्यात येते.औंध परिसरात फुटलेल्या मैलापाणी वाहिन्यांतून दूषित पाणी नदीपात्रात जाते. यामुळे पात्रातील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे.>हे मासे गायबअंबळ्या, चिंगळी, डाक्या, रऊ, शिंगाड्या, लोळ्या, आमळ्या, वाम, मरळ, रावस, कटला, पोपट, तांबिरे, कोळस, वालेंजी, सुरळी, सिंगीं, चालट, मांगुर इत्यादी मासे या नदीपात्रातून गायब झाले आहेत.>मुळा नदी पात्राच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येते. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे नदीची जैवविविधता धोक्यात आली आहे. यावर योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे.- गणेश कलापुरे, नदी स्वच्छता अभियानचे कार्यकर्ते