शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पुरंदर किल्ल्याला भीषण वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST

परिंचे : बहिरवाडी (ता. पुरंदर) या बाजूने पुरंदर किल्ल्याला भीषण वणवा लागला असून सुमारे तीन किलोमीटरपर्यंतचे किल्ल्यावरील जंगलाचे ...

परिंचे : बहिरवाडी (ता. पुरंदर) या बाजूने पुरंदर किल्ल्याला भीषण वणवा लागला असून सुमारे तीन किलोमीटरपर्यंतचे किल्ल्यावरील जंगलाचे क्षेत्र या वणव्यात जळाले असल्याचे माहिती बहिरवाडी गावचे सरपंच दशरथ जानकर यांनी दिली. वणवा पेटवणाऱ्यांचा शोध लावून दोषींवर वन विभागाने गुन्हे दाखल करण्याची मागणी जानकर यांनी केली आहे.

रविवारी दुपारी ही आग कोंडकेवाडीच्या बाजूने लागली. पुरंदर किल्ल्यावर असलेल्या लष्करी तळापर्यंत हा वणवा पेटत गेला आहे. कोंडकेवाडी ते बहिरवाडी परिसरात हा वणवा पसरला असून दर वर्षी वणवा लागण्याच्या घटना या परिसरात घडत असल्याने झाडांचे व वन्यप्राण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जानकर यांनी सांगितले. काही ठिकाणी शेतकरी शेताच्या कडेला काटेरी झुडपे किंवा कचरा पेटवण्यासाठी आग लावतात. पण वाऱ्यामुळे छोट्याशा आगीचे वणव्यात रुपांतर होते.

पुरंदर किल्ल्याच्या परिसरात उंच गवत असल्याने जाळ रेषा काढणे शक्य नाही. तसेच डोंगरावर तीव्र उतार असल्याने जाळरेषा काढणाऱ्यास मशीन घेऊन जाणे शक्य नसल्याचे वनरक्षक महादेव सस्ते यांनी सांगितले. किल्ल्याच्या पायथ्याशी येणारे पर्यटक किंवा मद्यपीच्या हलगर्जीपणामुळेसुध्दा वणवे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील डोंगर गवताळ असून वणवा लागल्यास या परिसरात मोठी नैसर्गिक हानी होत आहे. या डोंगररांगामध्ये वन विभागाच्या वतीने जाळरेषा काढल्या असत्या तर मोठी हानी टळली असती. काळदरी,बांदलवाडी, बहिरवाडीच्या परिसरात वणव्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होणे महत्त्वाचे असून वणवा विझवण्यासाठी लोकसभा वाढणे गरजेचे असल्याचे काळदरीचे सरपंच गणेश जगताप यांनी सांगितले आहे.

फोटो ओळ- पुरंदर किल्ल्याला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी झाली आहे.