शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बदली होऊनही अधिकारी पालिकेतच कार्यरत

By admin | Updated: July 7, 2016 03:39 IST

बदली झाल्यानंतरही महापालिकेतील पद सोडवत नसलेल्या अधिकाऱ्यांना वेतन अदा केले जात असल्याबद्दल पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालय (वेतन विभाग) यांनी हरकत

पुणे : बदली झाल्यानंतरही महापालिकेतील पद सोडवत नसलेल्या अधिकाऱ्यांना वेतन अदा केले जात असल्याबद्दल पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालय (वेतन विभाग) यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागानेही त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसल्याबाबत विचारणा केली आहे. नगरसेवकांमध्येही अशा अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी असून, त्याचे पडसाद स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत उमटले.महापालिकेत राज्य सरकारच्या विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीवर म्हणून अधिकारी पाठवले जात असतात. त्यांनी किती काळ पालिकेत काम करावे, याबाबत निश्चित ठरलेले असते. तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ते पालिकेत कार्यरत राहिल्यास त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात नियुक्ती दिली जाते. असे असूनही काही अधिकाऱ्यांना मात्र अभय मिळालेले दिसते आहे. प्रशासनात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नोव्हेंबर २०१३ मध्ये फक्त वर्षभराकरिता महसूल व वन विभागातून पाठवण्यात आले होते. सलग ४ वर्षे झाली तरीही हा अधिकारी अद्याप पालिकेतच कार्यरत आहे. संबंधित अधिकाऱ्याची सरकारने बदली केली; मात्र वर्ष उलटले तरीही त्याने तिथे रुजू होणे विविध कारणे देत टाळले आहे. त्यामुळे आता त्याच्या वेतनावर पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालयाने (वेतन विभाग) हरकत घेतली आहे. सन २०१४ पासून त्यांना वेतन अदा कसे केले जात आहे, अशा स्वरूपाची ही हरकत आहे. यासंबधी लोकशाही दिन ग्रुपचे पदाधिकारी व पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश खामकर यांनी सरकारकडे विचारणा केली होती. त्यावरून राज्य सरकारच्या नगर विकास विभागानेही संबंधित अधिकाऱ्याकडे खुलासा मागितला असल्याचे समजते.नगरसेवकांमध्येही अशा अधिकाऱ्यांबाबत नाराजी आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत समिती सदस्य सुनील गोगले यांनी याबाबत थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच विचारणा केली. (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे करावे लागते एकच कामपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही या अधिकाऱ्यांबाबत रोष आहे. हितसंबध निर्माण होतात म्हणून आयुक्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली करतात. सरकारनियुक्त अधिकाऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे काम देण्यात येते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.- सरकारनियुक्त अधिकाऱ्यांना प्रशासन, मालमत्ता व्यवस्थापन अशी लोकसंपर्क नसलेली कामे सोपविण्यात येतात व पालिकेच्या मूळ अधिकाऱ्यांना मात्र कचरा, आरोग्य, रस्ते दुरुस्ती अशी तक्रारींची संख्या जास्त असलेल्या कामांची जबाबदारी देण्यात येते, असे गोगले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. तसेच बदली होऊनही अधिकारी पालिकेतून का जात नाही, त्यांना पाठीशी का घातले जाते, अशी विचारणा त्यांनी केली. आयुक्त यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे गोगले यांनी सांगितले.