शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शंभर तक्रारी करूनही बावधन कचरामुक्त होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:10 IST

पुणे : बावधान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यांच्या कडेला कचराच कचरा दिसून येत ...

पुणे : बावधान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यांच्या कडेला कचराच कचरा दिसून येत आहे. याबाबत बावधन सिटीझन फोरम तर्फे शंभरहून अधिक तक्रारी महापालिकेकडे आणि संबंधित विभागात केल्या आहेत. परंतु, ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. फोरमचे सदस्य सतत या समस्येवर आवाज उठवत आहेत. पण महापालिकेकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही.

अनेक हॅाटेलचालक, नागरिक कचऱ्याच्या पिशव्या कुठेही टाकून देत आहेत. बावधन येथून जाणाऱ्या हायवेच्या कडेला तर प्रचंड प्रमाणात कचरा दिसून येतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे सर्वजण हैैराण झाले आहेत. त्यात या कचऱ्याची समस्या आणखी भर टाकत आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित तोडगा काढून बावधन कचरामुक्त करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे सर्व नागरिक घाबरलेले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधीत वाढ होत आहे. त्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एकीकडे पुणे राहण्यायोग्य शहर म्हणून देशात दुसऱ्या क्रमांकावर येते आणि दुसरीकडे शहरात कचरामुक्तीसाठी नागरिकांना आवाज उठवावा लागतो. हे अतिशय वाईट आहे. महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करून नागरिकांना योग्य सुविधा द्यायला हव्यात. तरच हे शहर राहण्यायोग्य ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

-------------------------

बावधन परिसरात प्रचंड कचरा साठला आहे. आम्हाला कचरामुक्त बावधन हवा आहे. महापालिकेकडे कितीदा तक्रारी दिल्या, पण त्यावर काहीच पावले उचलली जात नाहीत. महापालिका यंत्रणा सक्षमपणे काम करणारी हवी.

- मनीष देव, सदस्य, बावधन सिटीझन फोरम

------------------