शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

इच्छुकांचे डोळे लागले यादीकडे

By admin | Updated: January 30, 2017 03:10 IST

युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे

पुणे : युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे उमेदवारांच्या यादीकडे लागले आहेत. बऱ्याच वर्षांची इर्षा समोरासमोर काढण्याची संधी मिळाल्याने दोन्ही पक्षांतील अनेक संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहेत.सांगताही येत नाही व सहनही करता येत नाही, अशा युतीतील अनेकांची स्थिती होती. काहींनी यापुर्वीच्या निवडणुकीत बंडखोरीही करून पाहिली, पण पक्षाची मते मिळाली नसल्याने त्यांना अपयश पाहावे लागले. आता पक्ष बरोबर आहे, मैदान मारणारच असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. शहराच्या मध्यभागातील प्रभागांमध्ये प्रामुख्याने ही लढाई रंगणार, असा काहींचा होरा आहे. तिथे भाजपाचे वर्चस्व आहे, मात्र ते शिवसेनेच्या सहकार्यातून तयार झाले होते, आता शिवसैनिक फक्त शिवसेनेचाच प्रचार करतील व त्यातून खरी ताकद कोणाची ते समजून येईल, असे सांगण्यात येत आहे.भाजपाच्या गोटातही या लढाईचा सामना कसा करायचा, यावर मंथन सुरू झाले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमवेत शहराच्या पेठांमधील जनसंघापासूनच्या काही ज्येष्ठांची एक बैठक झाली असल्याची माहिती मिळाली. परिवारातील अनेक संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. मतदार आपलाच आहे, शिवसेनेवर टीका करून त्याला अस्वस्थ करायचे नाही, असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे समजते. आपला उमेदवार घरोघरी कसा जाईल, याची आखणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.दोन्ही पक्षातील नेत्यांच्या स्तरावरही याची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने आक्रमकपणा न सोडता भाजपावर टीकेचा भडिमार करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १० वर्षांत भाजपानेच काँग्रेस व राष्ट्रवादीला वेळोवेळी साथ दिली, त्यामुळेच शहराचा विकास खुंटला, या मुद्द्यावरून भाजपाला जेरीस आणायचा शिवसेनेच्या नेत्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येते. परिवर्तन मोर्चाला याच मुद्द्यावर नागरिकांची साथ मिळाली, त्यामुळे तोच मुद्दा घेऊन पुढे जाण्याचे ठरवण्यात आले आहे. पोस्टर, पत्रके तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळाली.भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकारी व उमेदवार, कार्यकर्त्यांना घाई करू नका, असा सल्ला दिला आहे. ते काय करतात ते पाहून नंतर प्रतिक्रिया द्या, ती मुद्देसूद असेल याची काळजी घ्या, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. स्वत: होऊन शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराच्या वाटेला जाण्याचे कारण नाही, मात्र त्यांच्याकडून आरोप झाल्यानंतर ऐकूनही घ्यायचे नाही, अशा प्रकारे सामना करण्यास सांगण्यात आले आहे.