शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:21 IST

रस्ता दुरूस्ती मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

उरुळी कांचन : उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना जिथं २ तासांचा प्रवास आहे तिथं त्यांना ४ तास घालवावे लागत आहे. यामुळे प्रवाशांबरोबरच येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या खड्डेयुक्त रस्त्याने जाताना वाहनांचेही अतोनात नुकसान होत असून इंधनही जास्त लागत आहे. म्हणजे वेळेबरोबरच पैशाचे नुकसानाही या लोकांना सहन करावे लागत आहे. परंतु यावर नाईलाज असल्याने या रस्त्याचा वापर करूनच प्रवासांना खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात २० नोव्हेंबर २०१८ रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांत झाडे लावून सरकार, लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याच्या अधिकाºयांचा पुरंदर हवेली तालुक्यातील जनतेने तीव्र निषेध करूनही अद्याप लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यापैकी कोणालाच घाम फुटला नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देविदास कांचन यांनी दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबाचे दर्शनासाठी जाणाºया भाविकांचे उरुळी कांचन ते जेजुरी रस्त्यावर असणाºया मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणेदेखील मुश्कील झाले आहे.जेजुरी, नीरा, लोणंद, सातारा, सांगली, फलटण, पंढरपूर, तसेच सासवड, नारायणपूर देवस्थान, केतकावळे बालाजी, भोर, मोरगावचा मयूरेश्वराचे दर्शनासाठी लाखो भाविक या रस्त्याने दररोज ये-जा करीत असतात. यामुळे या रस्ताची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाºयांना वेळोवेळी या रस्त्याबाबत लेखी-तोंडी निवेदने देऊनही त्या अधिकाºयांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर असणाºया खड्ड्यांत भरच पडली आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, असेही देविदास कांचन यांनी सांगितले.रस्त्याकडे पुरंदर व शिरूर हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधी जे सत्ताधारी आहेत त्यांचे दुर्लक्ष आहेच पण अधिकाºयांनी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हजारो प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणारे वाहनाचे नुकसान, आर्थिक व शारीरिक नुकसान कधीच भरून येणारे नाही, अशी भूमिका उरुळी कांचन ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी डॉ. बापूसाहेब धुमाणे यांनी मांडली ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुसत्याच वल्गना केल्या २०१७ अखेर एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही.पण २०१८ उलटून गेले तरीही खड्डे वाढले पण रस्ते काही सुधारले नाहीत! सरकारने ज्या अधिकाºयाच्या हद्दीतील रस्ते खराब असतील व तो त्याची योग्य ती देखभाल दुरुस्ती वेळेवर लक्ष देऊन करणार नाही त्याचे पगार थांबवावेत व त्या पैशांतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा