शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: January 22, 2015 23:32 IST

उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.

लेण्याद्री : आदिवासी भागातील करंजाळे गावातील समाजमंदिर पाडल्याप्रकरणी ग्रामस्थांचे दि. २१ पासून सुरू असलेले उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.पंचायत समिती प्रशासन जाणीवपूर्वक समाजमंदिर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. करंजाळे गावात ९७-९८ मध्ये समाजमंदिर बांधण्यात आले होते. माजी सरपंच चंद्रकांत जगताप यांनी मार्च २0१४ मध्ये समाज मंदिराचा काही भाग पाडल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. सुभाष जगताप, दिनकर जगताप, विक्रम चव्हाण, चेतन जगताप, ताराचंद जगताप, शंकर जगताप, उत्तम राक्षे, भरत पवार, सुदाम जगताप, गोविंद जगताप, सीताराम मांगले आदी ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.उपोषणासंदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी उपोषणस्थळी याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर समाजमंदिर बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून, चंद्रकांत जगताप यांच्या वतीने नवीन बांधकाम तीन महिन्यांत करून देण्याचे लेखी आश्वासन करंजाळेचे सरपंच व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, पंचायत समिती सदस्य पंडित मेमाणे, महेंद्र सदाकाळ, करंजाळेचे सरपंच यशवंत लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर) ४समाज मंदिराचा प्रश्न आतापर्यंत फक्त दै. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला होता. ‘लोकमत’मुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ४सदर समाजमंदिर बांधण्याच्या वेळेस जागामालकांकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीसपत्र करून घेण्यात आले नव्हते. तत्कालीन ग्रामसेवकाने बेजबाबदारपणे केलेल्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र संबंधित जागामालकाकडून विनामोबदला बक्षीसपत्र करून घेण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे.