शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: January 22, 2015 23:32 IST

उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.

लेण्याद्री : आदिवासी भागातील करंजाळे गावातील समाजमंदिर पाडल्याप्रकरणी ग्रामस्थांचे दि. २१ पासून सुरू असलेले उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.पंचायत समिती प्रशासन जाणीवपूर्वक समाजमंदिर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. करंजाळे गावात ९७-९८ मध्ये समाजमंदिर बांधण्यात आले होते. माजी सरपंच चंद्रकांत जगताप यांनी मार्च २0१४ मध्ये समाज मंदिराचा काही भाग पाडल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. सुभाष जगताप, दिनकर जगताप, विक्रम चव्हाण, चेतन जगताप, ताराचंद जगताप, शंकर जगताप, उत्तम राक्षे, भरत पवार, सुदाम जगताप, गोविंद जगताप, सीताराम मांगले आदी ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.उपोषणासंदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी उपोषणस्थळी याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर समाजमंदिर बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून, चंद्रकांत जगताप यांच्या वतीने नवीन बांधकाम तीन महिन्यांत करून देण्याचे लेखी आश्वासन करंजाळेचे सरपंच व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, पंचायत समिती सदस्य पंडित मेमाणे, महेंद्र सदाकाळ, करंजाळेचे सरपंच यशवंत लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर) ४समाज मंदिराचा प्रश्न आतापर्यंत फक्त दै. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला होता. ‘लोकमत’मुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ४सदर समाजमंदिर बांधण्याच्या वेळेस जागामालकांकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीसपत्र करून घेण्यात आले नव्हते. तत्कालीन ग्रामसेवकाने बेजबाबदारपणे केलेल्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र संबंधित जागामालकाकडून विनामोबदला बक्षीसपत्र करून घेण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे.