शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: January 22, 2015 23:32 IST

उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.

लेण्याद्री : आदिवासी भागातील करंजाळे गावातील समाजमंदिर पाडल्याप्रकरणी ग्रामस्थांचे दि. २१ पासून सुरू असलेले उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.पंचायत समिती प्रशासन जाणीवपूर्वक समाजमंदिर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. करंजाळे गावात ९७-९८ मध्ये समाजमंदिर बांधण्यात आले होते. माजी सरपंच चंद्रकांत जगताप यांनी मार्च २0१४ मध्ये समाज मंदिराचा काही भाग पाडल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. सुभाष जगताप, दिनकर जगताप, विक्रम चव्हाण, चेतन जगताप, ताराचंद जगताप, शंकर जगताप, उत्तम राक्षे, भरत पवार, सुदाम जगताप, गोविंद जगताप, सीताराम मांगले आदी ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.उपोषणासंदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी उपोषणस्थळी याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर समाजमंदिर बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून, चंद्रकांत जगताप यांच्या वतीने नवीन बांधकाम तीन महिन्यांत करून देण्याचे लेखी आश्वासन करंजाळेचे सरपंच व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, पंचायत समिती सदस्य पंडित मेमाणे, महेंद्र सदाकाळ, करंजाळेचे सरपंच यशवंत लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर) ४समाज मंदिराचा प्रश्न आतापर्यंत फक्त दै. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला होता. ‘लोकमत’मुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ४सदर समाजमंदिर बांधण्याच्या वेळेस जागामालकांकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीसपत्र करून घेण्यात आले नव्हते. तत्कालीन ग्रामसेवकाने बेजबाबदारपणे केलेल्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र संबंधित जागामालकाकडून विनामोबदला बक्षीसपत्र करून घेण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे.