शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार

By admin | Updated: February 19, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही

पुणे : जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही अनेक वसाहतींना गावठाण जाहीर करण्यात आलेले नाही. गावठाण विस्तार झाल्यास प्रकल्पग्रस्तांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या १८५ वसाहती असून, यापैकी केवळ ६९ वसाहतीमध्ये शंभर टक्के गावठाण जाहीर झाले आहेत. यामध्ये काही प्रकल्पांमध्ये ५० किंवा ७५ टक्केच गावठाण जाहीर झाले आहेत. तर अनेक ठिकाणी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी न जाता धरणाच्या लगतच्या गावाशेजारीच घरे बांधून वस्ती केली आहे. यामध्ये साडे तीनशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून घोषित करणे, त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावाला लगतच्या ग्रामपंचायतींत समावेश करणे किंवा केवळ एक-दोन गट लगतच्या गावठाणात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे धरणग्रस्तांच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचेही पाटील म्हणाले.