शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

शिफारशींअभावी गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित

By admin | Updated: October 27, 2015 01:13 IST

रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

पुणे : रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेकडून त्याकरिता शिफारशीच पाठविल्या जात नसल्याने वर्षभरात केवळ ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे सुविधा उपलब्ध असूनही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे.रुबी हॉस्पिटलमध्ये १२, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ तर एम्स हॉस्पिटलमध्ये १० बेड अशा एकूण २७ बेड दररोज गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी त्यांनी दहा हजार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात २०१४-१५ मध्ये रुबी हॉलमध्ये ३६ तर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १९ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना या सुविधेची माहितीच दिली जात नाही. त्यामुळे खासगी हॉस्पिटलचा फायदा होत आहे. यापूर्वी दोन वेळा याप्रकराविरुद्ध तक्रार करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आरोग्यप्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली. या वेळी विश्वास सहस्रबुद्धे उपस्थित होते.आरोग्य प्रमुखांच्या शिफारशीवरून गरीब रुग्णांवर या हॉस्पिटलनी मोफत उपचार करावेत, अशी तरतूद आहे. या योजनेची माहिती देणारे फलक या हॉस्पिटल बरोबरच महापालिका, सर्व क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने याठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली. महापालिकेकडे जर हे फलक लावण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, सजग नागरिक मंच स्वत:च्या पैशांमधून हे फलक उभारेल, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.गरीब रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा असूनही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचच्या वतीने १६ डिसेंबर २०१३ व १७ जुलै २०१४ रोजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. मात्र तरीही त्यांनी त्यामध्ये लक्ष घातले नाही, त्यामुळे आरोग्यप्रमुखांना आयुक्तही पाठीशी घालत आहेत, असा आरोप वेलणकर यांनी या वेळी केला.