शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्याने सर्वसामान्य रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST

मागील दीड वर्षापासून भोर तालुक्यातील गोरगरीब महिलांना प्रसूतीची गैरसोय, सर्पदंश, कुत्र्याची लस, अपघात झाल्यास योग्य ते उपचार वेळेत मिळत ...

मागील दीड वर्षापासून भोर तालुक्यातील गोरगरीब महिलांना प्रसूतीची गैरसोय, सर्पदंश, कुत्र्याची लस, अपघात झाल्यास योग्य ते उपचार वेळेत मिळत नाही. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण आणि शहरी नागरिकांना मनःस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भोर शहरातील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू असून मागील दीड वर्षापासून येथील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वर्षापूर्वी दरमहा ४५ ते ५० गर्भवती महिलांची प्रसूती व सिझर शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र ती सध्या पूर्णपणे बंद असून ती अन्य कोठे तरी प्रशासनाने सुरू केली आहे. मोफत प्रसूती होत नसल्याने खासगी दवाखान्यातील अवाच्या सव्वा फी आमच्या कुटुंबाला परवडत नाही, असा सूर भोर शहरासह ग्रामीण भागातील महिला व त्यांच्या कुटुंबांकडून येत आहे.

गर्भवती महिलांची उपजिल्हा रुग्णालयात होणारी नियमित तपासणी बंद झाली असून, महिलांची सोनोग्राफीही होत नसल्याने तालुक्यातील गर्भवती महिलांचे रुग्णसेवेअभावी मोठे हाल होत आहे. या रुग्णालयात सध्या कोणतेच उपचार मिळत नसून, सर्पदंश, कुत्र्याची लस मिळवण्यासाठीही रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. साधे टीटीचे इंजेक्शन टोचून घेण्यासाठी खासगी दवाखान्यात १०० रुपये द्यावे लागत आहेत. ओपीडीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवेअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, पर्यायी सेवाही योग्य वेळी मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे. ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले. मात्र उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यामुळे येथे सर्पदंश, कुत्र्याची लस मिळत नाही. त्यासाठी रुग्णांना नेरे किंवा आंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. अनेकदा लस उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. यात अनेकदा रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.