शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

अंतर्गत बससेवेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: January 5, 2015 23:13 IST

बारामती शहरांतर्गत हिरव्या रंगाच्या बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या, बंद पडणाऱ्या बसगाड्यांमुळे या सेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे.

बारामती : बारामती शहरांतर्गत हिरव्या रंगाच्या बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या, बंद पडणाऱ्या बसगाड्यांमुळे या सेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने आज प्रवाशी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांशी संवाद साधला. त्यात अनेक अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त आहेत. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा सप्ताहाची सुरुवात बारामती आगारात करण्यात आली. पण, ही सुरुवात फक्त कागदावर दाखविण्यापुरतीच मर्यादित होती, असे चित्र बारामती शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या बससेवेचे दिसत आहे. प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. प्रवाशांच्या तुलनेत कमी असणाऱ्या बस, बसचे अनियमित असणारे प्रमाण, बस बिघडण्याचे असलेले प्रमाण, बसच्या देखभालींकडे असलेले दुर्लक्ष झालेले दिसते. बारामती अंतर्गत बसस्थानकापासून ते एमआयडीसीमार्गे विमानतळापर्यंत ही अंतर्गत बससेवा आहे. मात्र, या बससेवा विस्कळीतपणे चालत आहे. या मार्गावरील बस या वेळेवर येत नसल्याची तक्रार तर नेहमीच चालू असते. सकाळची काही तास सोडले, तर १० नंतरच्या बस या कधीच वेळेवर येत नाहीत. यामुळे खासगी शिकवणी, कॉलेज, तसेच कामासाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्र्थी, तसेच नोकरदारांना नेहमीच पोहोचण्यास उशीर होतो. कधी या बस अर्धा तास, कधी १ तास, तर कधी दीड तासाने येतात. यामुळे विशेषत: मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे. त्यांच्याकडे कॉलेज किंवा शाळेत पोहोचण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी वाट पाहणे हा ‘एवढाच पर्याय’ असतो. शहरांतर्गत खासगी प्रवास करायचा असेल, तर त्याचे भाडे देणे म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. (वार्ताहर)४मागील काही दिवसांत शहरांतर्गत वाहतूक करणारी बस एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल गौरव’शेजारीच बंद पडली होती. तर या बसच्या देखभालीअभावी या बसमधून काळा धूर बाहेर पडत असतो. या धुरामुळे शहराच्या प्रदूषणात भरच टाकत असतो. तर बसने प्रवासी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास काढतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बस ही सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा ठरणारी असते. मात्र, बारामती आगाराने ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे.तुम्ही मागच्या बसने या४याबाबत विदारक अनुभव नाव न सांगण्याच्या अटींवर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘आम्ही कधी कधी १ ते दीड तास बसची वाट पाहत असतो. मात्र, या स्टॉपवर बस थांबत नाही. मागच्या बसने या.’ असे बऱ्याचदा वाहकांकडून सांगितले जाते. बऱ्याचदा बारामती बसस्थानकावर वाट पाहिल्यानंतर एकदम तीन बस येतात. मात्र, या तिन्ही बसचे वाहक दुसऱ्या बसमध्ये चढा. ही बस उशिराने जाणार आहे, असे सांगतात. या वागण्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. थांबा बनवलेत गतिरोधकांवर ४सुट्या पैशांअभावी होणारा त्रास हा तर प्रत्येक प्रवाशाला ठरलेलाच आहे. बहुतांशी वेळा बस या नेमून दिलेल्या थांब्याऐवजी आधी किंवा नंतर थांबत असते. शहरातील भिगवण चौकातील थांबा वगळता पंचायत समिती, श्रीरामनगर, हॉटेल सिटी इन येथील थांब्यावर बस कधी थांबतच नाही. कधी हा थांबा गतिरोधकांवर असतो, तर गतिरोधकांच्या आधी. मात्र, या थांब्यात प्रत्येक वाहकागणिक बदल होत असतो.