शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रवेशास शाळांचा नकारच

By admin | Updated: April 24, 2015 03:33 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत तीन वर्षांत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळू शकले नाही. त्यामुळे या वर्षी प्रवेशपात्र ठरलेल्यांना

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत तीन वर्षांत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळू शकले नाही. त्यामुळे या वर्षी प्रवेशपात्र ठरलेल्यांना प्रवेश देण्यास पिंपरी-चिंचवडमधील शाळांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी तक्रार पालकांनी शिक्षण मंडळाकडे केली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून आम्हालाही दाद दिली जात नाही, अशी हतबलता अधिकारी व्यक्त करू लागल्याने पालकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. २३ एप्रिल ही प्रवेशाची शेवटची तारीख होती. तरीही शाळेने प्रवेशाचे अर्ज स्वीकारण्यास विरोध केल्यामुळे व २३ एप्रिलनंतर प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पालक संभ्रमात होते. त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण मंडळाची बैठक सुरू आहे. त्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, असे सांगितले. त्यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्यामुळे पालकांची संभ्रमता आणखीच वाढली होती. दरम्यान प्रवेशाची तारीख वाढवण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यामध्ये ३० एप्रिलपर्यंत प्रवेशाची तारीख वाढविली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षण संचालकांनी प्रवेश नाकारणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. नंतर काही शाळांनी मुलांना प्रवेश देणे सुरू केले असले, तरी अनेक शाळा प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे शहरात १० टक्केही प्रवेश पूर्ण होऊ शकले नाही. प्रवेशाची तारीख वाढल्यामुळे पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, तारीख वाढूनही प्रवेश मिळणार का, असा प्रश्न आहे. प्रवेशासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यामध्ये फक्त १० टक्के प्रवेश मिळाले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी शासनच उदासीन आहे का? असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. शहरामध्ये आरटीई प्रवेशाच्या ३ हजार ८०० जागा आहेत. त्यामध्ये पहिला टप्प्यात १ हजार ६०० मुलांना प्रवेश देण्यात आले आहेत. तीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश कधी होणार? त्यामुळे सर्वच पालक चिंतेत पडले आहेत. त्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. महापालिका शिक्षण मंडळाकडे शहरातील जवळपास ४५ शाळांच्या विरोधात प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्या शाळांना नोटिसा काढलेल्या आहेत. मात्र, शाळांची भूमिका अजूनही बदललेली नाही. शासन गप्प असल्यामुळे प्रवेश द्यायचे, की फक्त प्रवेशाचे नाटक करायचे ठरवले आहे? असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहे. प्रवेश न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.