शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

प्रवेशास शाळांचा नकारच

By admin | Updated: April 24, 2015 03:33 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत तीन वर्षांत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळू शकले नाही. त्यामुळे या वर्षी प्रवेशपात्र ठरलेल्यांना

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत तीन वर्षांत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळू शकले नाही. त्यामुळे या वर्षी प्रवेशपात्र ठरलेल्यांना प्रवेश देण्यास पिंपरी-चिंचवडमधील शाळांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी तक्रार पालकांनी शिक्षण मंडळाकडे केली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून आम्हालाही दाद दिली जात नाही, अशी हतबलता अधिकारी व्यक्त करू लागल्याने पालकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. २३ एप्रिल ही प्रवेशाची शेवटची तारीख होती. तरीही शाळेने प्रवेशाचे अर्ज स्वीकारण्यास विरोध केल्यामुळे व २३ एप्रिलनंतर प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पालक संभ्रमात होते. त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण मंडळाची बैठक सुरू आहे. त्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, असे सांगितले. त्यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्यामुळे पालकांची संभ्रमता आणखीच वाढली होती. दरम्यान प्रवेशाची तारीख वाढवण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यामध्ये ३० एप्रिलपर्यंत प्रवेशाची तारीख वाढविली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षण संचालकांनी प्रवेश नाकारणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. नंतर काही शाळांनी मुलांना प्रवेश देणे सुरू केले असले, तरी अनेक शाळा प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे शहरात १० टक्केही प्रवेश पूर्ण होऊ शकले नाही. प्रवेशाची तारीख वाढल्यामुळे पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, तारीख वाढूनही प्रवेश मिळणार का, असा प्रश्न आहे. प्रवेशासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यामध्ये फक्त १० टक्के प्रवेश मिळाले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी शासनच उदासीन आहे का? असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. शहरामध्ये आरटीई प्रवेशाच्या ३ हजार ८०० जागा आहेत. त्यामध्ये पहिला टप्प्यात १ हजार ६०० मुलांना प्रवेश देण्यात आले आहेत. तीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश कधी होणार? त्यामुळे सर्वच पालक चिंतेत पडले आहेत. त्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. महापालिका शिक्षण मंडळाकडे शहरातील जवळपास ४५ शाळांच्या विरोधात प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्या शाळांना नोटिसा काढलेल्या आहेत. मात्र, शाळांची भूमिका अजूनही बदललेली नाही. शासन गप्प असल्यामुळे प्रवेश द्यायचे, की फक्त प्रवेशाचे नाटक करायचे ठरवले आहे? असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहे. प्रवेश न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.