शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भीमा-पाटसच्या मनमानी कारभाराचे प्रदर्शन : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST

भीमा-पाटसच्या संचालकांनी तांत्रिक अडचणी करुन कारखाना बंद पाडला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले ...

भीमा-पाटसच्या संचालकांनी तांत्रिक अडचणी करुन कारखाना बंद पाडला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता कारखान्याचे ४९ हजार सभासद आहे. परिणामी आज झालेल्या सर्वसाधारण सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी तीन ते चार सभासदांनाच बोलू दिल्याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचे प्रदर्शन झाले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सभासदाला कारखान्याच्या हिताचे प्रश्न या सभेत उपस्थित करता आले नाही, असे काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

कारखान्याची अवस्था बिकट आणि कर्जबाजारी करुन ठेवल्याने मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा-पाटस कारखाना सुरळीत व्हावा म्हणून ३६ कोटी रुपयांची मदत केली होती. त्यानुसार कारखाना एकच हंगाम सुरु राहिला. त्यानंतर कारखाना आजतागायत बंद असल्याने सभासद शेतकऱ्यांचे तसेच कामगारांचे अतोनात हाल सुरु आहे. तेव्हा कारखान्याच्या अडीअडचणीबद्दल बोलायचे सोडून इतर विषयांशी चर्चा करण्यात आली, ही दुर्दैवाची बाब आहे. सर्वसाधारण सभेच्या अहवालात लेखापरीक्षकांनी ढोबळमानानेच लेखापरीक्षण केलेले दिसते. याबाबत सभासदांना मत मांडायचे होते ते मांडू दिले नाही. विषयपत्रिकेत विषय क्र. १० ‘भीमा पाटस कारखाना सुरु करण्याबाबत धोरण ठरविणे’ हा होता. हा विषय का घेतला गेला हेच समजले नाही. कारण हा निर्णय संचालक मंडळाचा आहे. सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाला कारखानाहिताच्या निर्णयाचे सर्व अधिकार असतात. भीमा-पाटस गेल्या २५ वर्षांपासून इतर कारखान्याच्या तुलनेत सरासरी तीनशे रुपये प्रतिटन बाजारभाव कमी देऊनही कामगारांचे कोट्यवधी रुपयांचे पगार प्रलंबित आहेच. शेतकऱ्यांची देणीदेखील थकीत आहे, ही गंभीर बाब आहे. हा कारखान्याचा कोणत्या प्रकारचा पारदर्शकपणा आहे, असे शेवटी वासुदेव काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.