शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अवैध वाळूउपसा थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

केडगाव : उपशामुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडते, त्यामुळे अवैध वाळूउपसा थांबविण्यासाठी व कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ...

केडगाव : उपशामुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडते, त्यामुळे अवैध वाळूउपसा थांबविण्यासाठी व कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात केली आहे.

नियम २९३ अन्वये विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. कुल म्हणाले, मी ज्या भागातून येतो त्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम अवैध वाळूउपशामुळे होत आहे. ग्रामीण भागातील सामाजिक ताणतणाव याचा विचार करून शासनाने वाळूउपशाच्या संदर्भातले दूरगामी धोरण हाती घेण्याची आवश्यकता आहे. पुण्यासारख्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगाो इमारती उभ्या राहत असताना तसेच, उद्योग येत असताना वाळूची आवश्यकता आहे. परंतु राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास वाळूउपशाला बंदी घातल्यामुळे वाळूचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तो आदेश मान्य करणे योग्य आहे आणि दुसरा बाजूला वाळूची आवश्यकता आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा वाळूच्या तुटवड्यावर झाल्यामुळे वाळू, मुरूम, माती या अवैध स्वरूपाचा उपसा जिल्हा आणि परिसरामध्ये होतो. वाळूची आवश्यकता आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही, परंतु त्यासाठी असलेल्या स्टोन क्रेशरच्या आणि नव्याने विकसित झालेल्या कृत्रिम वाळूचा बाबतीत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मुळातच एका बाजूला अवैध वाळू आणि दुसऱ्या बाजूला वाळूची असलेली आवश्यकता याचा समतोल घडवण्याची आवश्यकता आहे.