शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: December 22, 2016 23:49 IST

नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा

कळस : नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा मार्ग कऱ्हाड ते अहमदनगर असा जोडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-पंढरपूर या मार्गांना ओलांडून जाणारा मार्ग आहे.कऱ्हाडवरून पुढे यामार्गे कर्जत, अहमदनगरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, औंध देवस्थान, गोंदवलेमहाराज ,बाबीरबुवा ही तिर्थक्षेत्रे आहेत. तसेच या मार्गावर अनेक साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था असून फळबागा व कृषी उत्पादनांची निर्मिती होणारा हा भाग आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पालखी महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व महामार्ग मंजूर झाले आहे. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. फक्त या मार्गाचेच चौपदरीकरण होणे बाकी आहे. ही बाब आमदार रामहरी रूपनवर यांनी मागील काही महिन्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपेक्षित मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्याची आश्वासन दिले होते. या भागाला न्याय दिला जाईल, असे सांगितले दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)