शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: December 22, 2016 23:49 IST

नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा

कळस : नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा मार्ग कऱ्हाड ते अहमदनगर असा जोडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-पंढरपूर या मार्गांना ओलांडून जाणारा मार्ग आहे.कऱ्हाडवरून पुढे यामार्गे कर्जत, अहमदनगरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, औंध देवस्थान, गोंदवलेमहाराज ,बाबीरबुवा ही तिर्थक्षेत्रे आहेत. तसेच या मार्गावर अनेक साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था असून फळबागा व कृषी उत्पादनांची निर्मिती होणारा हा भाग आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पालखी महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व महामार्ग मंजूर झाले आहे. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. फक्त या मार्गाचेच चौपदरीकरण होणे बाकी आहे. ही बाब आमदार रामहरी रूपनवर यांनी मागील काही महिन्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपेक्षित मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्याची आश्वासन दिले होते. या भागाला न्याय दिला जाईल, असे सांगितले दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)