शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

कालवा समितीच्या बैठकीला मुद्दाम उशीर

By admin | Updated: January 2, 2017 02:34 IST

पाणीवाटपाचे निर्णय घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होणे अपेक्षित असताना जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ही बैठक झालेली नाही.

पुणे : पाणीवाटपाचे निर्णय घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होणे अपेक्षित असताना जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ही बैठक झालेली नाही. कालवा समितीची बैठक घेण्यास जाणूनबुजून उशीर केला जात आहे, असा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी रविवारी केला. कारखान्यांच्या उसासाठी जादाचे पाणी सोडण्यासाठी तर हा विलंब केला जात नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.सजग नागरिक मंच व परिवर्तन संस्थेच्या वतीने ‘पक्षनेते व नागरिक : जनसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर बोलत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी, परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर उपस्थित होते. पाणीप्रश्न, फ्लेक्समुळे होणारे विद्रूपीकरण, वॉर्ड सभा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आदींबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत याची विचारणा या वेळी नेत्यांना करण्यात आली.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता, त्यानुसार तो पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र त्यासाठी कालवा समितीची बैठकच घेतली गेलेली नाही. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बैठक मार्चपर्यंत घेता येणार नाही. तरी पालकमंत्र्यांनी येत्या ३ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा.’’विनायक निम्हण म्हणाले, ‘‘शहराला ट्रॅफिक प्लानर हा अधिकारी नाही, त्यामुळे बहुतांश उड्डाणपुलांची रचना चुकलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरोग्यप्रमुख मिळालेला नाही. सर्वसामान्य नागरिकांवर भार टाकून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविणे योग्य नाही.’’सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘नगर रोड बीआरटीसाठी रिपाइंच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मीटर बंधनकारक करून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यास हरकत नाही.’’पीएमपी सक्षम व्हावी असे भाजपालाच वाटत नाही, अशी टीका किशोर शिंदे यांनी केली.(प्रतिनिधी)