शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

कालवा समितीच्या बैठकीला मुद्दाम उशीर

By admin | Updated: January 2, 2017 02:34 IST

पाणीवाटपाचे निर्णय घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होणे अपेक्षित असताना जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ही बैठक झालेली नाही.

पुणे : पाणीवाटपाचे निर्णय घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होणे अपेक्षित असताना जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ही बैठक झालेली नाही. कालवा समितीची बैठक घेण्यास जाणूनबुजून उशीर केला जात आहे, असा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी रविवारी केला. कारखान्यांच्या उसासाठी जादाचे पाणी सोडण्यासाठी तर हा विलंब केला जात नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.सजग नागरिक मंच व परिवर्तन संस्थेच्या वतीने ‘पक्षनेते व नागरिक : जनसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर बोलत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी, परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर उपस्थित होते. पाणीप्रश्न, फ्लेक्समुळे होणारे विद्रूपीकरण, वॉर्ड सभा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आदींबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत याची विचारणा या वेळी नेत्यांना करण्यात आली.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता, त्यानुसार तो पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र त्यासाठी कालवा समितीची बैठकच घेतली गेलेली नाही. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बैठक मार्चपर्यंत घेता येणार नाही. तरी पालकमंत्र्यांनी येत्या ३ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा.’’विनायक निम्हण म्हणाले, ‘‘शहराला ट्रॅफिक प्लानर हा अधिकारी नाही, त्यामुळे बहुतांश उड्डाणपुलांची रचना चुकलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरोग्यप्रमुख मिळालेला नाही. सर्वसामान्य नागरिकांवर भार टाकून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविणे योग्य नाही.’’सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘नगर रोड बीआरटीसाठी रिपाइंच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मीटर बंधनकारक करून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यास हरकत नाही.’’पीएमपी सक्षम व्हावी असे भाजपालाच वाटत नाही, अशी टीका किशोर शिंदे यांनी केली.(प्रतिनिधी)