शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

युती तुटल्याने समीकरणं बदलणारच

By admin | Updated: February 16, 2017 03:32 IST

सेना-भाजपा युती तुटल्यामुळे समीकरणं बदलत असून, ते अपरिहार्य आहेत. पण, मतदारांकडून विश्वासार्हता पाहिली जाईल आणि दीर्घ काळापर्यंत

पुणे : सेना-भाजपा युती तुटल्यामुळे समीकरणं बदलत असून, ते अपरिहार्य आहेत. पण, मतदारांकडून विश्वासार्हता पाहिली जाईल आणि दीर्घ काळापर्यंत कोण कुणाचा मित्र आहे हेसुद्धा तपासले जाईल, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सध्या भाजपाचे शक्तिप्रदर्शन म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा कार्यक्रम चालू आहे. तात्पुरती रंगरंगोटी करून शक्तिप्रदर्शन होत नाही, जे काही आहे ते अंत:करणात असावे लागते. शिवसेनेच्या द्वेषावर आधारित भाजपाने जे उसने अवसान आणले आहे, लोकांनाही माहीत आहे हा काय प्रकार आहे ते असे सांगून त्या म्हणाल्या, की लोकसभेला आमची युती होती; पण विधासभेला तुटली. परंतु, नंतर शिवसैनिकांनी सत्ता आणि समाज यांमधला दुवा म्हणून काम करावे, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. ही निवडणूक महापालिकेची आहे; पण कोणालाही विश्वासात न घेता स्मार्ट सिटीचा विषय असेल किंवा मेट्रोचा विषय असेल भाजपा आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला वगळण्याचे राजकारण केले. जे काम करीत आहे त्यात चित्र दिसत आहे, की सर्वच भागात आम्हाला चांगले उमेदवार मिळाले आहेत. पक्षाने स्वतंत्र जाण्याची भूमिका घेतल्याने बऱ्याचशा लोकांना तिकिटामध्ये स्थान मिळून त्यांच्यात उत्साह संचारला आहे. पुणेकरांमध्ये सातत्याने राष्ट्रवादीकडून जातीयतेचे राजकारण आणि तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला गेला, तर भाजपाने मोठ्या प्रमाणावर आयारामांना प्रवेश दिला आहे. सत्तेसाठी जो हापापलेपणा झाला तो पुण्यातील सांस्कृतिक नगरीमध्ये चारित्र्यसंपन्नतेचा आग्रह धरून राजकारण सुधारणेसाठी प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या विचारांचा हा पराभव आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल त्यांच्या सामाजिक सेवेचा पायाच जर भाजपाने डळमळीत केला असेल तर आपण कुणाला मजबूत करतो आहोत, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आमची प्रचारमोहीम जोरात सुरू आहे. २० वॉर्डांत जाऊन आम्ही प्रचार केला आहे. येरवडा, पर्वती भागात गेलो, महिला आणि युवकांची संख्या प्रचारात चांगली आहे. जे लढत आहेत त्यांच्याप्रति मतदारांचा विश्वास दिसून येत आहे. त्यामुळे भाडोत्री लोक प्रचारात दिसले नाहीत. शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी आहे. रिंगरोडसाठी जमिनी जात आहेत त्याच्यासाठी एमएसडीआरसीबरोबर आम्ही बैठक घेणार आहोत.