शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

आधी अतिक्रमणे हटवा; मगच कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:55 IST

अलंकापुरीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला होता. काही मोजक्याच ठिकाणी ही कारवाई झाली होती.

आळंदी : अलंकापुरीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला होता. काही मोजक्याच ठिकाणी ही कारवाई झाली होती. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू होती. यामुळे वाहतूककोंडी कायम होत होती. याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अतिक्रमण हटावचे फक्त ‘नाटक’ केल्याचे समोर आले होते. याचे वृत्त येताच आधी शहरातील ९ मीटर रस्तारुंदीकरणात अडथळा असणारे अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना नगर परिषद बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिल्या आहेत. त्यानंतरच रस्त्याचे काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे.आळंदीतील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. यातून मार्ग काढण्यासाठी आळंदीतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ही कारवाई अपूर्णच राहिली होती. असे असतानाही मोकळ्या जागेत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. ‘लोकमत’चे वृत्त येताच आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, अभियंता संघपाल गायकवाड, नगरसेवक प्रशांत कुºहाडे, शकूर हकीम आदींनी पाहणी केली. यावेळी लोकभावनांचा आदर करून प्रशासनाने लोकहिताचा विचार करून ९ मीटर रस्तारुंदीकरणाने बाधित नागरिकांनी या पूर्वीच्या रुंदीकरणाने संपादित रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर परिषदेने कारवाई केल्यास यासाठीचा होणार खर्च मालमत्ताधारकांकडून वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले.मंदिर परिसराकडे जाणाºया रस्त्यांचे यापूर्वी भूसंपादन करण्यात आले आहे. या रस्त्यांचे ९ मीटर रुंदीप्रमाणे भूसंपादन करून संबंधितांना मोबदलाही देऊन झाला आहे. निर्धारित रुंदीकरणाप्रमाणे जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. आणखी जागा मोकळी करून घेतल्यानंतरच सिमेंटीकरणाचे काम सुरु करण्यात येईल. तोपर्यंत सुरू करण्यात आलेले काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. या पाहणीत रस्त्याच्या रुंदीकरणाप्रमाणे जागा उपलब्ध होत नसल्याची बाब उघड झाली. रस्त्यांचे भूसंपादनाप्रमाणे मोबदला देण्यात आला. मात्र जागा मूळ मालकांनी रिकाम्या करून न दिल्याने रस्त्याचे जागेवर अतिक्रमण कायम असल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे लक्षात आले.यामुळे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी रस्त्यावरील नागरिकांनी स्व:त होऊन अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन केले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरू असल्याने नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे सांगितले.रस्ते विकासाला आळंदीत गती देण्यात आली आहे. आळंदी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हाती घेतलेल्या कामास साथ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.>पिण्याच्या टाक्यांच्या कामाची आळंदीत पाहणीआळंदीत चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम करण्यात आले आहे. या कामाचीदेखील पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केली. यावेळी पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे प्रमुख दत्तात्रय सोनटक्के उपस्थित होते. ंशहरात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्यासाठी उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करून घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. दत्त मंदिर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उच्च दाबाने पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे वितरण नलिकांचे काम पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन हाती घेण्यास सुचविण्यात आले.शासनाने आळंदीच्या विकासास मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून विकासकामे सुरु आहेत. वेळेची मर्यादा असल्याने सर्वांनी सहकार्य करून विकासकामाला साथ द्यावी. नगरसेवक पदाधिकाºयांची अतिक्रमणे असल्यास तत्काळ हटविण्यास त्यांनी सांगितले. विकासाच्या कामात गुणवत्तेत तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दर्जेदार विकासकामे करण्यास यंत्रणांनी प्राधान्य देण्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा