शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनखरेदीनंतर नोंदणीसाठीचा विलंब टळणार

By admin | Updated: December 17, 2015 02:10 IST

नवीन वाहनांची नोंदणी आता वाहन वितरकांनाच करावी लागणार आहे. राज्यात सर्वप्रथम बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ही योजना लवकरच कार्यान्वित होणार

बारामती : नवीन वाहनांची नोंदणी आता वाहन वितरकांनाच करावी लागणार आहे. राज्यात सर्वप्रथम बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे वाहनखरेदीनंतर नोंदणीसाठी होणारा विलंब टळणार आहे. बारामतीत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील परिवहन कार्यालयात ही योजना राबविण्यात येईल.बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून यापूर्वी वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी संगणकीकरण करण्यात आले आहे. राज्यात फक्त बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात त्यासाठी खास ‘ट्रॅक’ बनविण्यात आला आहे. वाहन चालविण्याची चाचणी संगणकाद्वारे केली जाते. परवान्यासाठी ‘आॅनलाईन’ परीक्षादेखील घेतली जाते. याच पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संपूर्णपणे संगणकीकृत करण्यासाठी वाहन प्रणाली ४ चा वापर होणार आहे. ग्राहकाने दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागत होती. आता ही पद्धत बदलण्यात येणार आहे. वाहन नोंदणीची जबाबदारी वाहन वितरकांवरच असेल. त्यासाठी खास सॉफ्टवेअर बनविण्यात आले आहे. वाहन वितरकांना आरटीओ कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे. खरेदी झालेले वाहन काही तासांतच नोंदणीकृत होईल. बारामतीमध्ये नोंदणी झालेल्या वाहनाची माहिती राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात पाहता येईल. या नोंदणीसाठी लागणारे शुल्कदेखील थेट आरटीओच्या खात्यावर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.या संदर्भात ‘लोकमत’ला माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले, की नोंदणी करणे, शुल्क भरणे यांसह अन्य बाबी वाहन वितरकांनाच कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची जबाबदारीदेखील त्यांचीच राहील. नोंदणी करताना चुकीची माहिती भरली नाही, याची खात्री त्यांनीच करावी, असेदेखील सांगितले आहे. खासगी आणि व्यावसायिक वाहनांचीदेखील नोंदणी याच पद्धतीने होणार आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दर महिन्याला किमान २ हजार दुचाकी, २५० ते ३०० चारचाकी गाड्या, मालवाहतूक गाड्या १५० ते २०० पर्यंत ट्रॅक्टर, ट्रेलर १०० ते २०० पर्यंत नोंदणी होतात. आता वितरकांनीच वाहनांची नोंदणी करायची आहे. त्याअनुषंगाने असणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला जात आहे. एनआयसी पुणे आणि दिल्लीच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)