शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भीमा नदीवर ढापे बसविण्यास विलंब

By admin | Updated: February 21, 2017 01:51 IST

देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.या भागातील शेतकरी नेहमीच दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले. परंतु ते पाणी दौड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील गहू, हरभरा, ऊस यांसारखी उभी पिके जळून चालली. या वर्षी पाणी असूनही ढापे न टाकल्याने देऊळगावराजेच्या बंधाऱ्यात दोन अडीच फूट पाणी शिल्लक आहे.पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. येथील शेतकरी सांगतात, फेबुवारी महिना संपत आला तरीसुद्धा अद्याप ढापे टाकले नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात काही ढापे वाहून गेले आहे आणि त्यातील काही ढाप्यांचे पत्रे निकामी झाले आहेत. त्यामुळे जरी ढापे टाकले तरी त्या ढाप्यातून पाणीगळती चालू राहील. परिणामी पाण्याच्या संदर्भात गेले दिवस पुढे येतील काय, अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळीच नवीन ढापे टाकावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.