शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जलतरण तलाव बंदचा निर्णय अखेर फिरविला

By admin | Updated: March 29, 2016 03:44 IST

शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ३२१ जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले होते. मात्र, त्याविरोधात

पुणे : शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ३२१ जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले होते. मात्र, त्याविरोधात निर्माण झालेल्या दबावापुढे झुकून आयुक्तांनी हा निर्णय फिरविला असून केवळ पिण्याचे पाणी वापरणारे तलाव बंद ठेवून उर्वरित जलतरण तलाव चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे सुधारित आदेश त्यांनी काढले आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एका दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, अचानक हा निर्णय त्यांनी बदलला आहे.शहरातील जलतरण तलावांना कशाचे पाणी वापरले, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व खासगी जलतरण तलाव सुरूच राहणार आहेत. जलतरण तलावांना प्रामुख्याने बोअरवेल, टँकरचे पाणी वापरले जाते; मात्र बहुसंख्य जलतरण तलावचालकांनी आपण विंधन विहिरींचे पाणी वापरत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडे केला आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या पाण्याचा वापर इतर आवश्यक कामांसाठी करता येऊ शकतो. मात्र, केवळ पिण्याचे पाणी वापरले जात असेल तरच तलाव बंद करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जलतरणपटूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ नये, याकरिता काही जलतरण तलाव सुरू ठेवण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र जलतरण संघटनेचे अध्यक्ष अभय दादे यांनी मुख्यमंत्री व आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.२१ तलाव बंदमहापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत असलेले २१ जलतरण तलाव मात्र जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.बंदचे आदेश नव्हतेशासनाने जलतरण तलाव बंद करण्याबाबत उचित निर्णय घ्या, असे निर्देश दिले होते; सर्व तलाव बंद करा, असे म्हटलेले नाही. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे तलाव बंद करण्याचा सुधारित आदेश काढण्यात आला आहे.- कुणाल कुमारआयुक्त, महापालिका