शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय

By admin | Updated: December 6, 2014 04:09 IST

माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिकांमार्फत सुरू आहे.

घोडेगाव : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिकांमार्फत सुरू आहे. अशी गावे निश्चित करून या गावांमध्ये ग्रामस्थ व शासकीय विभागांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निवारण व पुनर्वसनाचे नियोजन केले जाणार आहे. आंबेगाव तालुक्यात अशी १३ गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांची बैठक प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी घेतली. आंबेगाव तालुक्यात याचा सर्व्हे झाला आहे. यात जांभोरीची काळवाडी क्रं.१ व क्रं.२, फुलवडेची गणेशवाडी, भगतवाडी, माकडवाडी, बोरघर गावठाण, बोरघर काळवाडी, आहुपे साखरमाच, पोखरीची बेंढारवाडी, आसाणे, आमडे, दिगद, मेघोली, सावरली, साकेरी, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द अशी १३ गावे, वाड्यावस्त्या धोकाग्रस्त असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यातील जांभोरीची काळवाडी क्रं.१ व क्रं.२, पोखरीची बेंढारवाडी व फुलवडेची भगतवाडी ही तातडीची धोकाग्रस्त गावे असल्याचे भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सांगितले आहे. या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रांत अधिकरी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे यांनी या गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची बैठक घेतली. या वेळी समाजल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, माजी उपसभापती संजय गवारी, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे, पिंपरगणेचे उपसरपंच भीमा गवारी इत्यादी उपस्थित होते. धोकाग्रस्त गावांमधील ग्रामस्थांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही हालचाल लक्षात येताच प्रशासनाला याची कल्पना द्यावी. दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व शासनाच्या मदतीने सर्व उपयायोजना केल्या जातील. ग्रामस्थांची मागणी असेल तर आवश्यक गावांचे पुनर्वसनही केले जाईल. तसेच धोकाग्रस्त गावांमधील घरांची दुरुस्ती करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आर्थिक मदत केली जाईल. (वार्ताहर)