शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय

By admin | Updated: June 19, 2016 04:43 IST

सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या

पुणे : सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या काही हितचिंतकांच्या माध्यमातून विरोधकांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत चर्चा झाली असल्याचे समजते. त्याचप्रमाणे शिवसेनेबरोबर निदान काही काळ तरी सांभाळून घेण्याचाही निर्णय झाला असल्याची माहिती मिळाली.पक्षाच्या दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या उद््घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. नुकताच झालेला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा व त्यानंतर लगेचच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सुरू झालेले आरोप, त्यापूर्वी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या कामकाजावरून निर्माण झालेले वादंग हे सगळे ठरवून चाललेले असल्याचा मुद्दा एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीत उपस्थित केला. विरोधकांना त्यातही काँग्रेसला भाजपाची बदनामी करायची आहे, त्यांच्याकडूनच जास्त आरोप असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेतील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी द्यायची, त्यांना पक्षाबाहेरच्या हितचिंतकांची मदत मिळवून द्यायची व त्यांच्या माध्यमातून विरोधकांची काही प्रकरणे उकरून काढायची असे ठरवण्यात आले, अशी माहिती बैठकीला उपस्थित काही विश्वसनीय सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपांच्या घेऱ्यात अडकविले आहेच, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही काही प्रकरणे बाहेर काढून त्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडूनही पक्षाच्या नेत्यांवर कधी स्पष्टपणे तर कधी आडून आरोप होत असून त्याचाही पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाच वेळी सगळ्यांना अंगावर घेणे योग्य नाही. त्यामुळे शिवसेनेबरोबर सांभाळून घेण्याचा सल्ला ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याचेच प्रत्यंतर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उद््घाटनावेळी केलेल्या भाषणात उमटले. त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना शिवसेनेबरोबर चर्चा करून मतभेद मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनीही शिवसेनेबरोबर आमचे अनेक वर्षांपासूनचे राजकीय संबंध आहेत. त्यामुळे त्यांची टीका जास्त झाली, की आम्ही त्यांना उत्तर देतो, इतर वेळी नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.मुख्यमत्र्यांनी खोडले मंत्र्यांवरचे आरोपपुणे: विविध आरोपांनी घेरलेल्या राज्य सरकारमधील काही मंत्र्यांना शनिवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच क्लिन चिट दिली. ज्यांना सरकारी मालकीचे भूखंड लाटले त्यांनी आमच्या मंत्र्यांवर आरोप करू नये, आमचा एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही असे ते म्हणाले. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद््घाटन कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी खडसे यांच्यासह त्यापुर्वी आरोप झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, व अलीकडेच आरोप झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कसलाही भ्रष्टाचार झालेला नाही असे सांगितले. जमीन घोटाळ्यावरून नुकताच राजीनामा द्यावे लागलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे हेही यावेळी व्यासपीठावर बसले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर झालेल्या जमीन खरेदीच्या आरोपातही तथ्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.