शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

पाणीकपाती वाढीबाबत लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:36 IST

धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

पुणे : धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यातील नदीलगतच्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी खडकवासला धरणातून १.६० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पाणी नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीकपातीचा फेरआढावा घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने धरणामध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दौंड, इंदापूर येथे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पाणी नियोजन समितीमार्फत पाणी सोडण्याचे निर्णय घेतले जातात. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.धरणसाठ्यातील पाण्याचे नियोजन करताना १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जाते. दौंड, इंदापूरला पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे.