शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

पुरंदर सभापतींचा निर्णय आता अजित पवारांच्या कोर्टात

By admin | Updated: January 5, 2016 02:31 IST

पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतीनिवडीचा निर्णय आता अजित पवारांच्या कोर्टात सोडविला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खात्रीशीर सांगण्यात येत आहे.

जेजुरी : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतीनिवडीचा निर्णय आता अजित पवारांच्या कोर्टात सोडविला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खात्रीशीर सांगण्यात येत आहे. पुरंदर पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सभापती गौरीताई कुंजीर यांची गेल्या १५ सप्टेंबर रोजीच ठरलेली मुदत संपलेली आहे. त्यांच्यानंतर कोळविहिरे गणाच्या याच पक्षाच्या अंजनाताई भोर यांना संधी देण्याचे स्थानिक पक्षनेतृत्वाने ठरवलेले होते. मात्र, मुदत संपून तीन महिने उलटले, तरीही विद्यमान सभापती कुंजीर या राजीनामा देण्यासाठी पक्षादेशाची वाट पाहत असल्याने कार्यकर्त्यात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. या संदभार्तील वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी (दि. २) दिले होते. वृत्ताची दाखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पक्षनेतृत्वाने आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. बैठकीला तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगार्डे, जि. प. सदस्य विराज काकडे, पंचायत समितीच्या सभापती गौरीताई कुंजीर, सदस्या अंजनाताई भोर, सदस्य माणिक झेंडे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी विध्यमान सभापतींना राजीनामा देण्यासंदर्भात विचारणा केली होती; मात्र सभापती कुंजीर यांनी ज्येष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यास आपण राजीनामा देऊ, असा पवित्रा घेतला. सभापती निवडीच्या वेळी आम्हा दोघींत सव्वा-सव्वा वर्ष देण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याव्यतिरिक्त काहीही बोलण्यास नकार दिल्याने शेवटी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येत्या ९ तारखेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सुचवून बैठक संपवण्यात आली. या बैठकीसंदर्भात तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची युती आहे. बहुमत नसल्याने एकट्याने निर्णय घेता येत नाही. सत्तेतील सहभागी पक्षाशीही बोलावे लागणार आहे. त्याचबरोबर विद्यमान सभापती निवडीच्या वेळी नेमके काय ठरले होते, हे जिल्हाध्यक्ष आणि मला दोघांनाही माहीत नसल्याने पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून ते सांगतील तो निर्णय घेणार असल्याचे’ सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या घोळामुळे कोळविहिरे गणातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)