शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पालखी सोहळा यंदा निघावा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पालखी सोहळा यंदा निघावा की नाही या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.

दरवर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांची तर देहूगावातून तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. राज्यभरातले हजारो वारकरी या दोन्ही पालखी सोहळ्यांमधल्या शेकडो दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आषााढी वारीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि. २८) पुण्यात बैठक झाली. देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे प्रमुख व ज्येष्ठ वारकऱ्यांनी यावेळी काही अटी-शर्तींसह पायी पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी यासाठी प्रचंड अग्रह धरला. मात्र राज्यात पहिल्या लाटेपेक्षा सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. गर्दी झाल्यानंतर कोरोना आटोक्याबाहेर जातो याची राज्यात आणि देशात अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तरीदेखील वारी संदर्भात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य अधिकारी ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांना पवार यांनी सांगितले, की सर्व विश्वस्त व वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी आग्रही आहे. मात्र, आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की जिथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पालखी महामार्गावरील सातारा जिल्ह्यातही ती जास्त आहे. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही इतरांना येऊ देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणतो ते तो करतो. पण वास्तव लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.