शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वंचित रौंधळवाडी, चोरघेवाडीला मिळाला दिलासा

By admin | Updated: March 19, 2016 02:39 IST

भामा-आसखेड प्रकल्पातील अंशत: बाधित गावांपैकी रौंधळवाडी आणि चोरघेवाडीच्या १३.६७ कोटींच्या, नागरी सुविधा खास बाब प्रस्तावास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी

राजगुरुनगर : भामा-आसखेड प्रकल्पातील अंशत: बाधित गावांपैकी रौंधळवाडी आणि चोरघेवाडीच्या १३.६७ कोटींच्या, नागरी सुविधा खास बाब प्रस्तावास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षे नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या गावांना दिलासा मिळाला आहे. विधानभवनामध्ये ८ मार्च रोजी भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याविषयी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसन व आळंदी पाणीयोजना याबाबत पालकमंत्र्यांच्या आणि प्रमुख आमदार व नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत पुनर्वसन, आळंदी पाणीयोजना याबाबत निर्णय झाले होते. या बैठकीत रौंधळवाडी, चोरघेवाडी, शिवे, अनावळे, कासारी, वाघू, साबळेवाडी, पापळवाडी या भामा आसखेड धरणात अंशत: बाधित झालेल्या गावांसाठी खास बाब म्हणून नागरी सुविधांना एकूण २५ कोटी देण्याबाबत पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते.त्यानुसार प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली होती. यातील रौंधळवाडी, चोरघेवाडी-विरोबावस्ती याठिकाणी नागरी सुविधांची कामे करण्याचा १३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता तसेच पापळवाडी व गवारवाडी रस्ते व नागरी सुविधांचा १.७२ कोटी रुपयाचा प्रस्ताव होता. त्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिलीे. या प्रस्तावात विरोबावस्तीचे रस्ते, चोरघेवाडी रस्ता, विरोबावस्ती विद्युतपुरवठा, चोरघेवाडी विद्युत पुरवठा या वस्त्यांवर हातपंप, विरोबावस्ती व चोरघेवाडी येथे २ स्वतंत्र स्मशानभूमी शेड या कामांचा समावेश असून, प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या नुकसानभरपाई रकमेचा समावेश आहे. (वार्ताहर)शिवे येथील नागरी सुविधांचा खास बाबींचा ९ कोटींचा प्रस्ताव अर्थ विभागात प्रलंबित आहे. त्यालाही मंजुरी मिळावी, अशी शिवे ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे. भामा आसखेड धरणात काही गावे अंशत: बुडाली होती. या गावांनी पूर्वीच्या गावाच्या उत्तरेला आपल्या नवीन वस्त्या उभारल्या; मात्र गेल्या १४ वर्षांपासून त्यांना वीज, रस्ते, शाळा, पाणी, स्मशानभूमी इत्यादी नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागलेले आहे.