शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी डॉ. बाबा आढाव यांचं उपोषण सुरू

By admin | Updated: October 2, 2016 20:50 IST

शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण

राजानंद मोरे/ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2 - शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा देत आंदोलन व्यापक करण्याचा निर्णय घेतला. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर डॉ. आढाव यांनी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी न्यायमुर्ती पी. बी. सावंत, आपचे विजय पांढरे यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. महामंडळाचे संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते. 
 
उपोषणामागची भुमिका स्पष्ट करताना डॉ. आढाव म्हणाले, मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असला तरी केवळ आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी यावर जास्त बोलले जास्त बोलले जात आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्यावर फारशी चर्चा होत आहे. त्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून ते पुढेही सुरूच राहणार आहे. हमीभावाचा मुद्दा जनतेत गेला पाहिजे. नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अनागोंदी निर्माण झाली आहे. सरकार हमीभावाचा निर्णय घेत नसल्याने शेतकºयांची दैना होणार आहे. 
 
रघूनाथ पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात एका दिवसात आठ शेतकरी आत्महत्या करत होते. आता ती संख्या दुप्पट झाली आहे. सरकार बदलले असले तरी शेतकºयांची स्थिती कायम आहे. आढाव यांच्या आंदोलनामुळे शेतकरी व हमाल पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोन घटकांपुरते हे आंदोलन मर्यादित न राहता राज्यभर व्यापक करण्याचा विचार आहे. रस्ते, उ्डडाणपुल बांधण्यासाठी शासनाकडे पैसे असतात. पण शेतकºयांना देण्यासाठी हात रिकामे असतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.