शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी डॉ. बाबा आढाव यांचं उपोषण सुरू

By admin | Updated: October 2, 2016 20:50 IST

शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण

राजानंद मोरे/ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2 - शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा देत आंदोलन व्यापक करण्याचा निर्णय घेतला. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर डॉ. आढाव यांनी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी न्यायमुर्ती पी. बी. सावंत, आपचे विजय पांढरे यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. महामंडळाचे संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते. 
 
उपोषणामागची भुमिका स्पष्ट करताना डॉ. आढाव म्हणाले, मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असला तरी केवळ आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी यावर जास्त बोलले जास्त बोलले जात आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्यावर फारशी चर्चा होत आहे. त्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून ते पुढेही सुरूच राहणार आहे. हमीभावाचा मुद्दा जनतेत गेला पाहिजे. नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अनागोंदी निर्माण झाली आहे. सरकार हमीभावाचा निर्णय घेत नसल्याने शेतकºयांची दैना होणार आहे. 
 
रघूनाथ पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात एका दिवसात आठ शेतकरी आत्महत्या करत होते. आता ती संख्या दुप्पट झाली आहे. सरकार बदलले असले तरी शेतकºयांची स्थिती कायम आहे. आढाव यांच्या आंदोलनामुळे शेतकरी व हमाल पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोन घटकांपुरते हे आंदोलन मर्यादित न राहता राज्यभर व्यापक करण्याचा विचार आहे. रस्ते, उ्डडाणपुल बांधण्यासाठी शासनाकडे पैसे असतात. पण शेतकºयांना देण्यासाठी हात रिकामे असतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.