शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांत वाद

By admin | Updated: February 26, 2017 03:54 IST

नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या

पुणे : नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन्ही संघटनांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा स्फोट झाला. परिणामी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन व न्यायालयाची पायरी चढावी लागली. परंतु, वेळीच आवर घातला गेला नाही; तर हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून काही विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, या उद्देशाने विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित आहे. तसेच समाजात मांडल्या जाणाऱ्या विचारांवर कायद्याच्या चौकटीत राहून संघटनांनी लढा द्यावा. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून समाजातील दोन गटांकडून मांडल्या जाणाऱ्या विचारसरणीचा निषेध नोंदवला जात आहे. एखादा अधिकारी संघटनेच्या कामात अडथळा निर्माण करत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी केली जाते. त्यामुळे संघटनेच्या विरोधात बोलण्यास अधिकारी पुढे येत नाहीत. काही दिवसांपूर्वी महापुरुषाच्या जयंतीसाठी एका विद्यार्थी संघटनेने दमबाजी करून विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून हजारो रुपयांची वर्गणी वसूल केली. विद्यापीठ विद्यार्थी संघटनाच चालवत आहेत का? अशी चर्चा विद्यापीठात सुरू झाली आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. शांततेचे आवाहन विद्यापीठ प्रत्येकाच्या विचारांचा आदर करते. विद्यापीठाचे वातावरण शांत, सलोख्याचे आणि सुसंवादी राहील याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची वेळ विद्यापीठावर आणू नये. विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब न करता कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी केले आहे.