शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांत वाद

By admin | Updated: February 26, 2017 03:54 IST

नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या

पुणे : नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन्ही संघटनांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा स्फोट झाला. परिणामी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन व न्यायालयाची पायरी चढावी लागली. परंतु, वेळीच आवर घातला गेला नाही; तर हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून काही विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, या उद्देशाने विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित आहे. तसेच समाजात मांडल्या जाणाऱ्या विचारांवर कायद्याच्या चौकटीत राहून संघटनांनी लढा द्यावा. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून समाजातील दोन गटांकडून मांडल्या जाणाऱ्या विचारसरणीचा निषेध नोंदवला जात आहे. एखादा अधिकारी संघटनेच्या कामात अडथळा निर्माण करत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी केली जाते. त्यामुळे संघटनेच्या विरोधात बोलण्यास अधिकारी पुढे येत नाहीत. काही दिवसांपूर्वी महापुरुषाच्या जयंतीसाठी एका विद्यार्थी संघटनेने दमबाजी करून विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून हजारो रुपयांची वर्गणी वसूल केली. विद्यापीठ विद्यार्थी संघटनाच चालवत आहेत का? अशी चर्चा विद्यापीठात सुरू झाली आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. शांततेचे आवाहन विद्यापीठ प्रत्येकाच्या विचारांचा आदर करते. विद्यापीठाचे वातावरण शांत, सलोख्याचे आणि सुसंवादी राहील याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची वेळ विद्यापीठावर आणू नये. विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब न करता कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी केले आहे.