शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:41 IST

मित्रांसमवेत जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पुणे : मित्रांसमवेत जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये हा प्रकार घडला. प्रफुल्ल भीमराव वानखेडे (वय २१, रा. म्हात्रे पूल, दत्तवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या तळजाई स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा तलाव आहे. प्रफुल्लला जलतरण तलावातून बाहेर काढल्यानंतर तातडीने त्याला सातारा रस्ता येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तत्पूर्वी सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा पाठविण्यात आला. बारावीत नापास झाल्याने प्रफुल्ल पुनर्परीक्षेसाठीचा अभ्यास करीत होता. तसेच तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तर त्याच्या मोठा भाऊ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रफुल्लचा जीव गेला असल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला.याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. एका जीवरक्षकाकडे चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.>योग्य खबरदारी न घेतल्याचा बळी?जलतरण तलावांवर दुर्घटना घडू नये यासाठी रेस्क्यू रिंग, बारा फूट लांब बांबू, प्रथमोपचार पेटी, तलावाची खोली याविषयी माहिती देणारे फलक, आॅक्सिजन किट, तलावानजीकच्या हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक, अचानक काही दुर्घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सचे क्रमांक, तलाव परिसरात घ्यावयाची काळजी आदींची संपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे.तलावांवर प्रवेश करतानाच सुरक्षिततेसाठी रेलिंग लावणे, स्वतंत्र महिला प्रशिक्षक नेमणे, महिलांच्या बॅचना ठरावीक वेळा नेमून देणे, आदी नियम पालिकेने घातलेले असतात. मात्र, त्यातील अनेक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे योग्य खबरदारी न घेतल्याने हा मृत्यू झाले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.