शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

बामणोलीच्या जलाशयात बुडून पुण्याच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 22, 2015 22:46 IST

पोहताना दुर्घटना : कॅम्पसाठी आलेल्या युवकावर काळाची झडप

सातारा : एनसीसी कॅम्पसाठी आलेल्या पुण्याच्या विद्यार्थ्याचा रविवारी सकाळी बामणोलीजवळ (ता. जावळी) कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला. कॅम्प आटोपून पुण्याला परतण्याच्या तयारीत असताना काही विद्यार्थी पोहण्यास उतरले, तेव्हा ही दुर्घटना घडली.प्रसन्न मुकुंद नाईक (वय २१, रा. चिंचवड-पुणे) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, ‘एमआयटी’ अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला तो शिकत होता. एनसीसीच्या कॅम्पसाठी या महाविद्यालयाचे सुमारे ऐंशी विद्यार्थी दोन खासगी बसमधून बामणोली, वासोटा परिसरात शुक्रवारी (दि. २०) आले होते. बामणोलीजवळ शेंबडी येथे नारायणपूरच्या अण्णामहाराज मठाच्या परिसरात राहुट्या उभारून ते राहिले होते. वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंगचा अनुभव घेऊन सर्वांनी शनिवारी रात्री राहुट्यांमध्ये मुक्काम केला. रविवारी सकाळी आवरासवर करून पुण्याला परतण्याच्या तयारीत विद्यार्थी होते. कॅम्पमधील काही विद्यार्थी सकाळी नऊच्या सुमारास कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी उतरले. लांबीला कमी असलेला जलाशयाचा भाग त्यांनी पोहण्यासाठी निवडला होता. प्रसन्न नाईक पोहून पलीकडच्या तीरावर पोहोचला. तेथे विश्रांती घेऊन तो पुन्हा अलीकडच्या तीरावर येण्यासाठी पाण्यात उतरला. दमछाक झाल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. काही विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. बुडत असलेल्या प्रसन्नला घेऊन विद्यार्थी किनाऱ्यावर आले आणि तातडीने त्याला बामणोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. नंतर सर्वजण गाड्यांमधून सातारच्या खासगी रुग्णालयात आणि तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचले. परंतु प्रसन्नचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)