शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

पिढीजात फळझाडांचे ‘भिरुड’मुळे मरण

By admin | Updated: June 6, 2015 23:35 IST

अनेक पिढ्यांना फळांची गोडी देणाऱ्या शेकडो वर्षांच्या आंब्याच्या महाकाय वृक्षांना ‘भिरुड’ (स्थानिक भाषेत भुंगीर) किडीने ग्रासले आहे.

अंकुश जगताप,  पिंपरीअनेक पिढ्यांना फळांची गोडी देणाऱ्या शेकडो वर्षांच्या आंब्याच्या महाकाय वृक्षांना ‘भिरुड’ (स्थानिक भाषेत भुंगीर) किडीने ग्रासले आहे. हवामान बदलामुळे या किडीच्या प्रादुर्भावाने या वर्षातच हजारो वृक्ष गतप्राण झाले आहेत. वाळवीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गावातील एकामागून एक फळझाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे गावोगावी देशी फळझाडांवर कृषी, वन, सामाजिक वनीकरण विभाग, तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागील काही वर्षांत वृक्षलागवड मोहिमेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. त्यामुळे शहरांसह गावोगावी नवीन वृक्षांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यामध्ये बहुतांश रायवळ, विदेशी वृक्षांचे प्रमाणच अधिक असून फळझाडांचे प्रमाण नगण्यच आहे. अशा स्थितीत मागील काही वर्षांमध्ये नागरीकरणासाठी शहरी, निमशहरी भागांत शेकडो वर्षे जुन्या असलेल्या आंबा, चिंच, जांभूळ अशा देशी फळझाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच मानवी हस्तक्षेपामुळे रायवळ आंबा, जांभूळ आदी फळझाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता असमतोल पर्यावरणामुळे अशी झाडे कीड , रोगराईला बळी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. याचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील डोंगरी व निमसदाहरित वन प्रदेशात मोडणाऱ्या मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, वेल्हा या तालुक्यांमधील झाडांना बसत आहे. एकाच वर्षात एकेका गावातील शेकडो वर्षे जुनी ४ ते ७ झाडे दगावण्याचे प्रकार घडत आहेत. जुन्या रायवळ झाडाला हजारो आंबे लगडतात. अनेक झाडांना दर वर्षी फलधारणा होते. संकरित झाडांचा आकार मर्यादित, फळे तुलनेने कमी, तसेच आडसाल उत्पन्न मिळते. त्या तुलनेत विचार करता रायवळ आंब्याच्या एका झाडापासून ५ ते १० हजार फळे मिळतात. त्यामुळे संपूर्ण शेतकरी कुटुंबाला खाण्यासाठी मनसोक्त आंबे मिळून मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतात. मात्र, अशी मोठी झाडे अचानक वाळल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात रायवळ आंबा खायलाही मिळत नसल्याची विदारक स्थिती गावोगावी दिसून येत आहे. जुनी झाडे जगण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी घेतलेले अपार कष्ट आपल्या चुकांमुळे वाया जाऊ देऊ नका. या झाडांची काळजी घेतल्यास नवीन झाडांच्या किती तरी पट अधिक उत्पन्न मिळू शकते. घरगुती पद्धतीने भिरुड किडीचे नियंत्रण करण्यासाठी छिद्रामध्ये पेट्रोल अथवा रॉकेल ओतावे. छिद्र बोहेरून लिपावे. १ लीटर पाण्यात ४ मि.ली. क्लोरोपायरीफॉस टाकलेले द्रावण पंपाने खोड, फांदी धुऊन निघेपर्यंत फवारावे. - विनायक कोथिंबिरे, तालुका कृषी अधिकारी, मावळभिरुड हा एक प्रकारचा किडा आहे. त्याचे शास्त्रीय नाव मॅँगो स्टीमबोरर असून शेतकरी भुंगीर म्हणूनही संबोधतात. खोडामध्ये अथवा मोठ्या फांदीमध्ये छिद्र पाडून हा कीडा झाडाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो. तेथेच प्रजनन वाढते. त्यानंतर अशा अनेक किड्यांमुळे झाडाचा गाभा निकामी होतो. किडा असलेल्या छिद्राबाहेर लाकडाचा भुसा बाहेर पडलेला दिसतो. अन्नद्रव्याअभावी झाड वाळून जाण्याचा धोका असतो. भुरुड किडीचे छिद्र आढळल्यास उपाययोजना तत्काळ करावी. शक्यतो असे छिद्र मोठे करून त्यामध्ये तार खोचून किडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. क्लोरोपायरीफॉस, कावची भुकटी व पाणी यांचे घट्ट द्रावण करावे. या द्रावणाचा लेप किडीचा उपद्रव झालेल्या बुंध्याला, फांद्यांना लावावा. - हनुमंत घाडगे, विस्तार कृषिविद्यवेत्ता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पुणेआमच्या शेताच्या बांधावर पूर्वजांनी लावलेली आंब्याची जुनी झाडे आहेत. त्यापासून मिळणाऱ्या फळांचा आजवर आम्हाला मनमुराद आस्वाद घेता आला. मात्र, या वर्षी अचानकच झाडाला भुंगीर आणि वाळवी लागली. काही कळण्याआधीच झाड मरून गेले. त्यामुळे आधीच्या पिढीने ही झाडे जगविण्यासाठी केलेल्या मेहनतीवर पाणी पडल्याचे दु:ख आहे. हे नुकसान कधीही भरून निघण्याजोगे नाही. - तानाजी गायकवाड, शेतकरी, जांबे, ता. मुळशी