शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाचा मृत्यू

By admin | Updated: May 8, 2017 02:08 IST

बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. यामध्ये एका पाडसाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.अन्नपाण्याच्या शोधात सकाळपासून हरणांचा कळप मानवीवस्तीलगत फिरत होता. या परिसरातील कुत्र्यांच्या टोळीने कळपाचा पाठलाग केला. यामध्ये पाडस कळपातून पाठीमागे राहिल्याने कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावले. पण चाव्याची जखम खोल असल्याने पाडसाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमीर मुजावर, दत्तात्रेय खोपडे, शिवाजी मुळीक, प्रतीक मुळीक या तरुणांनी झालेल्या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली. वनमजूर एसबी पानसांडे यांच्यासह ४ वनमजुरांनी पंचनामा करून पाडस ताब्यात घेतले. मुढाळे गावालगत वनविभागाची मोठी जमीन आहे. या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे. गेल्या महिन्याभरापासून वनहद्दीतील प्राण्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याने त्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत होती. पण बारामती वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र त्यात घाण साचली आहे. जमिनीवरील टाक्यात पाणीच टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील हरणांचे कळप बागायती भागातील मनुष्यवस्तीकडे येतात. मानवीवस्तीजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. या परिसरात पोल्ट्री असल्याने मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जातात. कोंबड्यांच्या मांसावर चटावलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्या हरणांच्या कळपावरही नजर ठेवतात. आजारी हरिण किंवा पाडसावर आक्रमण करून जखमी करतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. शनिवारी सकाळी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाचा पाठलाग केल्याचे जवळच्या शेतकऱ्याने पाहिले होते. कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण कुत्र्यांच्या चाव्याने घाबरलेल्या पाडसाचा मृत्यू झाला होता. यापुढे वनविभागने येथील हरणांची काळजी घेतली पाहिजे. अन्नपाण्याची सोय केली पाहिजे, अशी अपेक्षा प्राणीमित्रांनी केली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करणारयापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. परिसरातील पोल्ट्रीमालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. पाणीसाठ्याबाबत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती तालुका वनअधिकारी शिवाजी राऊत यांनी दिली.