शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाचा मृत्यू

By admin | Updated: May 8, 2017 02:08 IST

बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. यामध्ये एका पाडसाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.अन्नपाण्याच्या शोधात सकाळपासून हरणांचा कळप मानवीवस्तीलगत फिरत होता. या परिसरातील कुत्र्यांच्या टोळीने कळपाचा पाठलाग केला. यामध्ये पाडस कळपातून पाठीमागे राहिल्याने कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावले. पण चाव्याची जखम खोल असल्याने पाडसाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमीर मुजावर, दत्तात्रेय खोपडे, शिवाजी मुळीक, प्रतीक मुळीक या तरुणांनी झालेल्या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली. वनमजूर एसबी पानसांडे यांच्यासह ४ वनमजुरांनी पंचनामा करून पाडस ताब्यात घेतले. मुढाळे गावालगत वनविभागाची मोठी जमीन आहे. या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे. गेल्या महिन्याभरापासून वनहद्दीतील प्राण्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याने त्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत होती. पण बारामती वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र त्यात घाण साचली आहे. जमिनीवरील टाक्यात पाणीच टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील हरणांचे कळप बागायती भागातील मनुष्यवस्तीकडे येतात. मानवीवस्तीजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. या परिसरात पोल्ट्री असल्याने मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जातात. कोंबड्यांच्या मांसावर चटावलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्या हरणांच्या कळपावरही नजर ठेवतात. आजारी हरिण किंवा पाडसावर आक्रमण करून जखमी करतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. शनिवारी सकाळी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाचा पाठलाग केल्याचे जवळच्या शेतकऱ्याने पाहिले होते. कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण कुत्र्यांच्या चाव्याने घाबरलेल्या पाडसाचा मृत्यू झाला होता. यापुढे वनविभागने येथील हरणांची काळजी घेतली पाहिजे. अन्नपाण्याची सोय केली पाहिजे, अशी अपेक्षा प्राणीमित्रांनी केली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करणारयापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. परिसरातील पोल्ट्रीमालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. पाणीसाठ्याबाबत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती तालुका वनअधिकारी शिवाजी राऊत यांनी दिली.