शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाचा मृत्यू

By admin | Updated: May 8, 2017 02:08 IST

बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. यामध्ये एका पाडसाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.अन्नपाण्याच्या शोधात सकाळपासून हरणांचा कळप मानवीवस्तीलगत फिरत होता. या परिसरातील कुत्र्यांच्या टोळीने कळपाचा पाठलाग केला. यामध्ये पाडस कळपातून पाठीमागे राहिल्याने कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावले. पण चाव्याची जखम खोल असल्याने पाडसाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमीर मुजावर, दत्तात्रेय खोपडे, शिवाजी मुळीक, प्रतीक मुळीक या तरुणांनी झालेल्या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली. वनमजूर एसबी पानसांडे यांच्यासह ४ वनमजुरांनी पंचनामा करून पाडस ताब्यात घेतले. मुढाळे गावालगत वनविभागाची मोठी जमीन आहे. या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे. गेल्या महिन्याभरापासून वनहद्दीतील प्राण्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याने त्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत होती. पण बारामती वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र त्यात घाण साचली आहे. जमिनीवरील टाक्यात पाणीच टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील हरणांचे कळप बागायती भागातील मनुष्यवस्तीकडे येतात. मानवीवस्तीजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. या परिसरात पोल्ट्री असल्याने मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जातात. कोंबड्यांच्या मांसावर चटावलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्या हरणांच्या कळपावरही नजर ठेवतात. आजारी हरिण किंवा पाडसावर आक्रमण करून जखमी करतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. शनिवारी सकाळी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाचा पाठलाग केल्याचे जवळच्या शेतकऱ्याने पाहिले होते. कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण कुत्र्यांच्या चाव्याने घाबरलेल्या पाडसाचा मृत्यू झाला होता. यापुढे वनविभागने येथील हरणांची काळजी घेतली पाहिजे. अन्नपाण्याची सोय केली पाहिजे, अशी अपेक्षा प्राणीमित्रांनी केली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करणारयापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. परिसरातील पोल्ट्रीमालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. पाणीसाठ्याबाबत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती तालुका वनअधिकारी शिवाजी राऊत यांनी दिली.